tag:blogger.com,1999:blog-69900885713913112852024-02-20T23:40:14.937-08:00सुशान्त म्हणे...सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.comBlogger20125tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-45098439766822232402021-06-07T05:41:00.001-07:002021-06-07T06:17:44.794-07:00सुबोध<div style="text-align: justify;"><br /></div><p style="text-align: left;"></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCHHeIrrJ8K4iXIovEqSubtvU9gcuOSSrvd_vTIxhViBnCoVuWaS-e5nZH4QjzfDuw4BCicOYaDT9wTSynMfciC2qPsbGbezXLSX1Wc9HCaRkO0SmkdkhgiJgNTkgmofmsogppAPk-wuo/s2048/DSCN1024.JPG" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1536" data-original-width="2048" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCHHeIrrJ8K4iXIovEqSubtvU9gcuOSSrvd_vTIxhViBnCoVuWaS-e5nZH4QjzfDuw4BCicOYaDT9wTSynMfciC2qPsbGbezXLSX1Wc9HCaRkO0SmkdkhgiJgNTkgmofmsogppAPk-wuo/w400-h300/DSCN1024.JPG" title="सुबोध" width="400" /></a></span></div><span style="font-size: medium;"> </span><p></p><p style="text-align: center;"><span style="font-size: medium;">सुबोध</span><br /></p><p style="text-align: center;"><span style="font-size: medium;"> <span style="font-size: small;">(छायाचित्राचे श्रेय : श्री. आशिष आल्मेडा)</span></span></p><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">माणसामाणसांतल्या संबंधांमागचं काही गणित असेलही. पण मला तरी अजून ते उलगडलेलं नाही. आपल्या
आयुष्यात आपल्याला वेगवेगळी माणसं भेटत राहतात. काहींचा सहवास सातत्याने लाभूनही जवळीक मात्र
निर्माण होत नाही. उलट काही लोक सहवासात नसले तरी मनांत घर करून राहतात.
</span></p><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
सुबोधला जाऊन आता महिना होत आला तरी ती बातमी खरी नाही, निदान खरी असू नये, असं वाटत
राहिलंय. सुबोधशी मैत्रीचं नातं जुळलं ते फार वेगळं होतं. आम्ही परस्परांच्या व्यक्तिगत गोष्टी फारच
क्वचित बोललो असू एकमेकांशी. रूढार्थाने ज्याला जीवलग मैत्री म्हणतात तिची लक्षणं ह्या मैत्रीत
कुणाला क्वचितच दिसतील. पण तरी त्याच्या जाण्याने काही तरी हरवल्याची जाणीव मनात येतच
राहिली. स्मरणं तपासू लागलो तर ह्या जाणिवेचा काही बोध होऊ शकेल असं वाटतं.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
इ. स. २००२च्या सुमारास संवाद ह्या वाचकगटाच्या कार्यक्रमात सुबोधची भेट झाली. नेमकी कधी ते
आठवत नाही. पण एका कार्यक्रमानंतर रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत राहिल्याची नोंद माझ्या
दैनंदिनीत आहे. त्या गप्पांत सहभागी असणाऱ्यांत सुबोधचं नाव आहे.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
संवाद ह्या वाचकगटाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी मराठी साहित्यावर चर्चेचा
कार्यक्रम असे. विषय रोचक असत. सहभागाला कुणालाच कसलीच आडकाठी नव्हती. गटाचं स्वरूप बरंचसं
अनौपचारिक होतं. भेटीची जागा तशी माझ्या तेव्हाच्या घरापासून जवळची होती. वरळीच्या नेहरू
केंद्राच्या तालीमकक्षात ह्या चर्चेसाठी सगळे जमायचे. सगळंच सोयीचं होतं. त्यामुळे अगदी सहजच मी
त्या उपक्रमांना उपस्थित राहू लागलो आणि चर्चेनंतरच्या चर्चेतही.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
चर्चेत सहभागी होणारे बरेच असले तरी काही लोक अर्थातच लक्ष वेधून घेणारे होते. संवादची सगळी
जमवाजमव सहजपणे करणारे प्रमोद बापट हे तर संवादचं केंद्र आहे हे सहज लक्षात येण्याजोगं
होतं. लक्ष वेधून घेणाऱ्यांत एक सुबोधही होता. विषय कोणताही असला तरी त्याच्याकडे त्यातलं वेगळं
सांगण्यासारखं काही तरी असायचं. त्याचं वाचन चौफेर होतं. मुख्य म्हणजे ते केवळ पुस्तकांपुरतं मर्यादित
नव्हतं. नियतकालिकांतल्या लेखांचे, दिवाळीअंकांचे संदर्भ त्याच्या बोलण्यात अगदी सहज
यायचे. जादुगाराने आपल्या पोतडीतून काही तरी अद्भुत काढून दाखवून आपल्याला मंत्रमुग्ध करावं तसं
आपल्या पोतडीतून सुबोध काय काय काढून दाखवायचा. बरं हे सगळं सहज व्हायचं. त्यात आपल्याला किती
माहीत आहे हे दाखवण्याचा आव नसायचा. आपलंच ऐकवण्याचा अट्टाहासही नव्हता. इतरांना दाद
देण्याचा उमदेपणाही होताच.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
संवादच्या ठरलेल्या विषयावरील चर्चेनंतर मोजक्या लोकांच्या गप्पा सुरू होत. सुबोध त्यात
असायचाच. पुढेपुढे तर त्या संवादनंतरच्या संवादासाठीच आम्ही भेटू लागलो की काय असं वाटायला
लागलं. रात्रीरेव व्यरंसीत असं होऊ लागलं. माझं घर तसं जवळ होतं. पण इतर अनेक जण लांब लांब
राहणारे. उपनगरांतले. पण गप्पा अशा रंगायच्या की वेळेचं भानच उरायचं नाही. मार्गाच्या कडेला उभं
राहून तासन् तास आम्ही बोलत असू. कधी बंद दुकानांच्या पायऱ्यांवर थोडं टेकतं होत असलो तर
तेवढंच.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
ह्या काळात सुबोधच्या भेटीगाठी झाल्या त्या मुख्यत्वे संवादच्या निमित्ताने. पण हळू हळू निष्कारणही
आम्ही भेटू लागलो हेही आठवतंय. सुबोध हा सतत काहीतरी योजना डोक्यात घेऊनच
वावरायचा. संवादच्या सहकाऱ्यांपुढे त्याने एक योजना तेव्हा मांडली होती. पुस्तकांच्या मानाने
नियतकालिकांतलं साहित्य वैशिष्ट्यपूर्ण असलं तरी दुर्लक्षित राहतं. त्यामुळे दर तीन महिन्यांनी
नियतकालिकांतल्या निवडक साहित्याचा परिचय करून देणारी एक त्रैमासिक पत्रिका टाइम्स लिटररी
मॅगझिनच्या धर्तीवर काढावी अशी त्याची योजना होती. ही योजना त्याने ज्यांच्यापुढे मांडली होती
ते आम्ही सगळे आपापल्या निर्वाहाच्या कामांत इतके अडकलेले होतो की त्यानंतर त्या योजनेचं काही
झालं नाही हे सांगायची आवश्यकता नाही. पण नंतरही सुबोध अशा योजना आखत राहिला आणि सांगत
राहिला. बऱ्याचशा योजना बारगळल्या तरीही.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
नंतरच्या काळात मी आयाआयटी मुंबईतल्या संगणकविज्ञान आणि संगणकअभियांत्रिकी विभागांतर्गत
भारतीय-भाषा-तंत्रज्ञान-केंद्रात काम करत असताना कालांतराने सुबोधही काही काळ तिथे माझा
सहकारी म्हणून काम करत होता. तो तिथे कसा लागला ते आठवत नाही. पण तिथे सुबोध आल्यामुळे
त्याचा सहवास अधिक मिळाला. तिथल्या मित्रपरिवारात तो अर्थातच मिसळून गेला. ते दिवस
खरोखरंच आयुष्यातले फार छान दिवस होतो. मनांत उत्साह होता. आव्हानात्मक अभ्यासविषय होते आणि
कडोविकडीचे वाद घालता येतील आणि मनसोक्त चर्चा करता येईल असे सगळे मित्र होते.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
तिथे चालणाऱ्या चर्चांत सुबोधच्या मार्मिक टिप्पण्या रंग भरायच्या. ह्या काळात एक गोष्ट अगदी
स्पष्टपणे लक्षात आली ती म्हणजे एखादी गोष्ट समजून घेऊन ती नेमक्या शब्दांत मांडण्याची सुबोधची
क्षमता. ही क्षमता इतकी अफाट होती की 'सुबोध उवाच' अशा नावाचा संग्रहच काढावा अशी चर्चा
आमच्या मित्रांत होत असे.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
गणिताचा अभ्यासक असलेल्या आमच्या एका तर्कप्रेमी मित्राचं वर्णन करताना सुबोध म्हणाला,
"आपल्या शिडी लागते ती आपल्याला वर जायचं असतं किंवा खाली यायचं असतं ह्यासाठी. पण त्याला
शिडीवरून वरखाली करता येतं ह्याचाच आनंद आहे." नीट पाहिलं तर हे वर्णन टवाळकीचं
नव्हतं. तर्कबुद्धीकडे पाहण्याच्या आमच्या आणि त्या दृष्टिकोणातलं अंतरही ह्यात अधोरेखित झालं
होतं. आम्ही तर्काचा उपयोग साधन म्हणून करत होतो. त्याला तर्काचे आकृतिबंध शोधण्यात रस होता
ही गोष्ट सुबोधने नेमक्या शब्दांत सांगितली होती.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
सुबोधला अशा गोष्टी सहज दिसायच्या. आमचं काम भाषा आणि संगणक ह्यांच्यातल्या संवादाच्या
व्यवस्था तयार करण्याचं होतं. त्यामुळे व्याकरणिक विश्लेषणावर चर्चा व्हायच्या, वाद
व्हायचे. एऱ्हवीच्या बोलण्यातही व्याकरणातल्या संज्ञांचा वापर व्हायचा. क्रियापदांचं विश्लेषण
करताना काळ, व्याप्ती आणि अर्थ ह्या अनुषंगाने विश्लेषण होतं. इंग्लिशेत ह्यांना अनुक्रमे टेन्स,
आस्पेक्ट आणि मूड अशा संज्ञा आहेत. त्यांची आद्याक्षरी टीएएम ह्या अक्षरांनी टॅम अशी होते. तर
सुबोधने एकदा मर्ढेकरांच्या कवितेतल्या ओळी आम्हा सर्वांना इ-टपालाने पाठवल्या : "होते, आहे,
होइल यांतुन वीज वाहते होण्याचीच". ह्या पत्राला शीर्षक दिलं होतं : "मर्ढेकरांची टॅम कविता".
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
सुबोधचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला अनेक विषयांत रस तर होताच. पण गतीही होती. त्याचं औपचारिक शिक्षण
म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयातली पदविका तो उतरला होता. पण त्याची जिज्ञासा पदवीने
अडवलेली नव्हती. त्याचं वाचन चौफेर होतं. श्रीनिवास हरि दीक्षितांच्या 'भारतीय तत्त्वज्ञान' ह्या
पुस्तकापासून अमेरिकी कादंबऱ्यांपर्यंत त्याने बरंच काही वाचलं होतं आणि तो सतत वाचतही
असायचा. राजीव साने ह्यांची मांडणी त्याला आवडायची. शिक्षणक्षेत्रांतल्या प्रयोगांकडे त्याचं लक्ष
असे. डब्ल्यू. टी. सॉयर ह्यांच्या दि व्हिजन इन एलिमेंटरी मॅथेमॅटिक्स ह्या पुस्तकातली मांडणी त्याला
खूप आवडली होती. आपल्याला आवडलेल्या पुस्तकांविषयी सुबोध इतकं प्रभावी वोलायचा की तो तुमचा
विषय असो वा नसो, ते पुस्तक आपण वाचलंच पाहिजे असं वाटायचं.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
भाषेची सूक्ष्म जाण असल्याने साहित्यातले बारकावे सुबोधला कळायचे. त्याचं कवितावाचन अर्थवाही
असे. त्याच्या कवितावाचनाचं ध्वनिमुद्रण करायला हवं होतं असं आता जाणवायला लागलं. पण आता उशीर
झालाय. कवितेतली सौंदर्यस्थळं तो अचूक टिपायचा. शंकर वैद्य ह्यांची 'हा असा पाऊस पडत असताना'
वाचताना त्या कवितेतला सगळा मिश्कीलपणा सुबोधच्या वाचनातून ठळक व्हायचा. आयआयटीत असताना
एकदा त्याने मंगेश पाडगांकरांच्या प्रेमकविता वगळून इतर कविता वाचण्याचा कार्यक्रम ठरवला
होता. त्यावेळी सुबोधने वाचलेली 'सकाळ' ही त्यांच्या विदूषक ह्या संग्रहातली कविता आताही माझ्या
कानांत आहे. दया पवारांच्या 'उत्खनन' ह्या कवितेत शेवटच्या "बरे झाले, असे शहर गाडण्याच्याच
लायकीचे" ह्या ओळीने साधलेल्या उत्कर्षबिंदूचं रसग्रहण त्याच्याकडूनच ऐकावं असं असे.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
एखाद्या विषयात कुतूहल वाटलं की मिळेल त्या मार्गाने त्या विषयाची माहिती मिळवायची त्याची
वृत्ती होती. मग तो त्या विषयांतल्या तज्ज्ञांना भेटण्यासाठी प्रयत्न करायचा. 'मराठी व्याकरण :
वाद आणि प्रवाद' ह्या पुस्तकातली मांडणी त्याला आवडल्यावर कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर ह्यांना
भेटण्यासाठी तो पुण्याला त्यांच्या घरी जाऊन पोहोचला. पण त्या वेळी त्यांचं वय झालं होतं. त्यामुळे
चर्चा हवी तशी झाली नाही. सुबोधच्या मते ते तेव्हा तर्ककर्कश युक्तिवाद करणारे अभ्यासक राहिल नव्हते तर
प्रेमळ आजोबा झाले होते. पण तरी त्यांचे शुद्धलेखनाविषयीचे लेख महाजालावर घालण्यासाठी त्यांची
अनुमती घ्यायला सुबोधने खूप साहाय्य केलं होतं.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
'संवाद वाचकगटा'च्या विविध उपक्रमांत सुबोधचा सहभागच असायचा असं नव्हे. तो सक्रिय
असायचा. बोरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने केलेला एक कार्यक्रम गोव्यात झाला. तो पार पाडण्यात सुबोधने बरंच
योगदान दिलं होतं. आमची एकत्र भेटण्यासाठीची जागा नंतर मिळेनाशी झाली तेव्हा सुबोध वेगवेगळ्या
ठिकाणी भेटण्याच्या युक्त्या सुचवायचा. उपाहारगृहांत, मैदानांत असे प्रयोग करून झाले. नंतर वांद्र्याला
त्याच्या ओळखीने एका शाळेतही एक चर्चा झाली. पण नंतर 'संवादभेटी' उणावतच चालल्या होत्या. तेव्हा
सुबोधने फेसबुकावर एक गट करून तिथे चर्चा करण्याचा मार्ग सुचवला. त्याने गटही तयार केला.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
सुबोधच्या वृत्तीत एक भटक्या होता. त्याच्याविषयी भाकितं करणं कठीण असे. त्याच्या मनात असेल तर
तो कुठेही प्रकट व्हायचा. नाही तर त्याची भेट कधी होईल हे सांगता यायचं नाही. तो असला
आपल्यासोबत तर आपला असे. नाही तर नाही.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
एकदा सुबोध आणि मी नाणेघाटाला जायचं ठरवून निघालो. सकाळी निघून संध्याकाळी परतायचं असा बेत
होता. नाणेघाटात पोहोचल्यावर घाटमाथ्यावरून पलीकडे गेल्यावर देशावर जाता येईल हे लक्षात
आलं. मग लगेच बेत बदलला. घाटमाथ्यावरच्या एका शेतकऱ्याच्या घरी विचारणा केल्यावर दुपारी जुन्नरला जाणारी एसटीची बस
मिळू शकेल हे कळलं. मग ती बस धरून जुन्नरला पोहोचलो. रात्री तिथेच एका धर्मशाळेत राहिलो. दुसऱ्या
दिवशी शिवनेरी आणि लेण्याद्री पाहून मगच मुंबईला पोहोचलो.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
आपण केलेल्या गोष्टी मिरवत न बसणं हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य. त्याने आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या
गोष्टी करून पाहिल्या होत्या. त्या अनुभवांचं मोलही दिलं होतं. पण त्यांतून त्याच्या गाठीशी बरंच
संचितही जमलं होतं. पण हे संचित तो फारसं मिरवत नसे. कधी तरी सहज बोलता बोलता त्याच्या तोंडून
काही कळलं तर कळायचं. त्यामुळेच शिक्षणक्षेत्रातल्या त्याच्या कामामुळे तो किती लोकप्रिय आहे ह्याची
कल्पना त्याच्या शोकसभेपर्यंत खऱ्या अर्थाने आलीच नाही. त्याचं कौतुक वाटायचं. पण आदर वाटायला
हवा होता हे फार उशिरा जाणवलं.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">शिक्षणातला ज्ञानाचा आनंद आणि शिक्षणव्यवस्थेत शिकणाऱ्यांची व्यावहारिक प्रयोजनं ह्या दोन्ही
गोष्टींचं सजग भान सुबोधच्या बोलण्यातून दिसायचं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा उतरण्याचे
उपाय तो सुचवायचा. परीक्षा उतरणं हे एक तंत्र आहे असं तो अनेकदा म्हणायचा. पण विषय कळण्यासाठी
केवळ तंत्र पुरत नाही. गणित आणि विज्ञान नीट शिकता येण्यासाठी विद्यार्थ्याचं किमान एका भाषेवर
चांगलं प्रभुत्व हवं अशी त्याची ठाम धारणा होती. विद्यार्थ्यांना सल्ले अनेकजण देत असतील. पण विद्यार्थ्यांची भाषा सुधारण्यासाठी त्यांनी कोश वापरले पाहिजेत हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे पालक आणि कोश प्रकाशित करणारी संस्था ह्यांना एकत्र आणण्याची कल्पना त्यालाच सुचायची.<br /></span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
आता विचार करतो तेव्हा लक्षात येतं की सुबोध मला भेटल्यानंतर तो अनेक ठिकाणी माझ्यासोबत
होता. त्यांपैकी अनेक गोष्टींशी त्याचा कोणताही थेट संबंध नव्हता. पण त्याला जिज्ञासा होती आणि
तो कर्ता सुधारक होता. मराठी-अभ्यास-केंद्राच्या वतीने आम्ही युनिकोडाची पहिली कार्यशाळा घेतली
तेव्हा कार्यशाळेच्या पूर्वतयारीला आदल्या दिवसापासून सुबोध माझ्यासोबत होता. कार्यशाळेच्या
दिवशीही होता. अशोक शहाणे ह्यांच्याशी कोलटकरांविषयी गप्पा मारायचा कार्यक्रम ठरला. तेव्हा
त्यांना सोबत घेऊन येण्यापासून पुन्हा घरी सोडण्यापर्यंतचं दायित्व सुबोधने आपणहून घेतलं
होतं. अर्जुनवाडकरांचे लेख संकेतस्थळावर घालण्यासाठी त्यांच्या अनुमतिपत्रावर त्यांची स्वाक्षरी
घेण्यासाठी सुबोध पुण्याला गेला होता. संवाद वाचकगटाने नंतर राबवलेल्या 'आप्तवाक्य' ह्या उपक्रमात
सुबोध सहभागी होताच. पण नंतर त्या कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणं घेऊन त्यांतील महत्त्वाचे अंश संकलित
करून <a href="https://www.youtube.com/channel/UCREYz-4DpNvWsN0wSQ91_zA" target="_blank">यूट्यूबेवर</a> घालण्याचा उद्योगही सुबोधनेच केला. त्यासाठीचा पाठपुरावाही तोच करत राहिला.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
ह्याच वृत्तीने तो अनेक गोष्टी करत राहिला. त्यातल्या काही त्याच्याकडून कळल्या होत्या. बचतगट
चालवायला मार्गदर्शन करणं, दबावगट निर्माण करणं इ. तीन-चार वर्षांपूर्वी त्याने दोन उपक्रम
आखले. एक होता गणेशोत्सवांत मराठी शाळांविषयी जागृती करण्याचा. त्यासाठीचे फलक त्याने बनवून घेतले
होते. गणेशोत्सवांच्या व्यवस्थापकांना भेटून ते लावण्याची व्यवस्था करणं आणि तिथे जमलेल्या लोकांशी
बोलायची संधी मिळवणं अशी दोन कामं करायची होती. मला तरी ह्या कामांत फारसं यश लाभलं
नाही. बाकी काय झालं ते माहीत नाही. दुसरा उपक्रम म्हणजे मराठी शाळांत जाऊन मुलांना चांगल्या
कविता वाचून दाखवायच्या. त्यासाठी त्याने एका पत्राचा मजकूरही तयार केला होता. ते पत्र घेऊन
मीही काही शाळांत गेलो. एकाच शाळेने प्रारंभी सहकार्य करायचं आश्वासन दिलं. पण नंतर काहीच
नाही. पण सुबोधकडे अशा योजनांची उणीव नव्हती. त्याला आणखीही काय काय सुचतच राहायचं.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
लिहिण्यासारखं पुष्कळच आहे. सगळंच लिहिता येईल असंही नाही. त्यातून सुबोध मला जसा दिसला तसाच इतरांना दिसला असेल असं नाही. माणसाच्या जगण्याला अनेक पैलू
असतात. त्याचा मला जो मर्यादित सहवास लाभला त्यांत मला ज्या गोष्टी अनुभवता आल्या त्यांत
प्राधान्याने एका जिज्ञासू, रसिक, सक्रिय कार्यकर्त्या मित्राची प्रतिमा मला जाणवली. सगळ्यांना
सुबोध असाच दिसला असेल असंही नाही.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
सुबोधविषयी सांगताना दोन वैयक्तिक प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. आयाआयटीत असताना नंतर नंतर
कामाविषयीचं असमाधान वाढू लागलं होतं. नवीन असतानाची नवलाई संपली. कोणत्याही नोकरीत
आपल्याला हवं तसं सगळं घडतंच असं नाही हे अद्याप उमगलेलं नव्हतं. अशा वेळी सगळ्या असमाधानाचा आणि
त्राग्याचा त्रास सहन करावा लागायचा तो सहकाऱ्यांना. आज विचार करताना आपल्या मूर्खपणाचं हसूही
येतं आणि आपण मित्रांशी कसे वागलो ह्याची लाजही वाटते. अशाच एका उद्रेकाच्या क्षणी आता आपण ही
नोकरी करू नये असं वाटू लागलं. आपण करतोय ते सगळं निरर्थक आहे. हे काम आपल्या योग्यतेचं नाही असं
काहीही मनात येऊ लागलं. हे कुणाशी बोललो नव्हतो. पण वर्तन बदललेलं दिसतच होतं. सहकारी आणि मित्र समजूत काढायला आले तर मी त्यांच्याविषयीच गैर समज
करून बसलो आणि त्यांनाच दुरुत्तरं केली. खूप चिडचिड करून घेऊन घरी आलो. खूप वाईट मनस्थिती
होती. आपण मित्रांशी चुकीचं वागलो ह्याची जाणीव होती. कामावर जावंसंच वाटत नव्हतं. सगळं जगणंच
निरर्थक वाटत होतं. अशा वेळी संध्याकाळी प्रमोद बापट आणि सुबोध माझ्या घरी आले. बापटांना सुबोध
घेऊन आला होता हे उघड होतं. त्या दोघांनी मला काय समजावलं हे मला आता लक्षातही नाही. पण ती
संध्याकाळ आणि त्या दिवशी त्या दोघांचं येणं मी विसरू शकणार नाही.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
दुसरा प्रसंग माझे वडील गेले तेव्हाचा. वडिलांची साखर कमी झाल्याने ते कोमात गेले होते. केईएम
रुग्णालयात कृत्रिम श्वासोच्छ्वासावर त्यांना ठेवलं होतं. मी सकाळी त्यांना तिथे दाखल केलं तेव्हापासून
रुग्णालयातच होतो. सकाळी त्यांना दाखल करायला नेताना सुबोधचा दूरध्वनी आला होता. तेव्हा केवळ
त्याला असं असं झालंय हे सांगितलं होतं. रात्री रुग्णालयात थांबण्यासाठी सुबोध आला. मी त्या दिवशी
तिथेच थांबायचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याला म्हटलं तू घरी जा. पण तो मला सोबत द्यायला
तिथेच थांबला. झोप काही होणार नव्हती. तरी त्याने काही काळ आग्रहाने मला झोपायला
लावलं. सकाळी मी घरी गेल्यावर आई रुग्णालयात यायची होती. सुबोधने सकाळी माझ्यासाठी खायला
आणलं. मला काही खायची इच्छा नव्हती. पण त्याने खूप आग्रह करून दोन घास खायला लावले. मी खात
असतानाच वडिलांची प्राणज्योत मालवल्याचं यंत्रांनी दाखवलं. माझा भाऊ मला सांगायला आला. मी
जाऊन पाहिलं आणि पायांतलं त्राणच गेलं. पुढचा काही काळ काहीच कळलं नाही. पण ह्या काळात सुबोधने
सगळ्या मित्रांना कळवलं होतं. पुढची व्यवस्था लावून मगच तो तिथून निघाला.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
ह्या दोन्ही प्रसंगांत सुबोधने माझ्यासाठी ज्या गोष्टी केल्या त्यांविषयी त्याने नंतर कधी एक शब्दही
काढला नाही. ते त्याचं सहजकर्म होतं.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: center;"><span style="font-size: medium;">
उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे राष्ट्रविप्लवे । </span></p><p style="text-align: center;"><span style="font-size: medium;">राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स बान्धवः ।।
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
हे मित्रलक्षण सुबोधने बऱ्यापैकी निभावलं होतं. मला मात्र त्याची परतफेड करता आली नाही.
</span></p><span style="font-size: medium;">
</span><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">
प्रियजनवियोग ही आयुष्यातली अपरिहार्य घटना आहे हे जाणवण्याच्या वयाच्या टप्प्यावर आता पोहोचलो
आहे. वाचनातून, अनुभवांतून आता असे प्रसंग येणं स्वाभाविक आहे ह्याची जाणीवही झाली आहे. पण ज्याविषयी
असा विचारच केला नव्हता अशा कुणाचं तरी अचानक कालवश होणं स्वीकारायला जड जातंच. ०७ जून हा
त्याचा वाढदिवस. ह्यापुढे शुभेच्छा देण्याऐवजी स्मरणच करायचंय हे कालौघात उमजून येईलच. </span></p><p style="text-align: left;"><span style="font-size: medium;">कालवश
व्यक्तींचा उल्लेख करताना वापरण्यात येणाऱ्या धर्मसंबद्ध संज्ञांऐवजी स्मृतिशेष ही इहवादी
संज्ञा आम्हा दोघांनाही आवडली होती. सुबोधविषयीच ती वापरण्याचा योग येईल हे मात्र वाटलं
नव्हतं. </span></p><p><span style="font-size: medium;"><br />============================================</span></p><h3 style="text-align: left;">सुबोधच्या लेखनाचे आणि भाषणांचे महाजालावरचे दुवे<br /></h3><p dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"><span style="font-size: medium;"><span style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"> </span></span></p><p dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"><span style="font-size: medium;"><span style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">अनुदिनी</span></span></p><ul style="margin-bottom: 0px; margin-top: 0px; padding-inline-start: 48px;"><li aria-level="1" dir="ltr" style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; list-style-type: disc; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre;"><p dir="ltr" role="presentation" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"><span style="font-size: medium;"><a href="https://srujankshan.blogspot.com/" style="text-decoration: none;"><span style="background-color: transparent; color: #1155cc; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration-skip-ink: none; text-decoration: underline; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">सृजनक्षण</span></a></span></p></li><li aria-level="1" dir="ltr" style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; list-style-type: disc; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre;"><p dir="ltr" role="presentation" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"><span style="font-size: medium;"><a href="http://shikshanprayog.blogspot.com/" style="text-decoration: none;"><span style="background-color: transparent; color: #1155cc; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration-skip-ink: none; text-decoration: underline; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">शिक्षणप्रयोग</span></a></span></p></li></ul><p dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"><span style="font-size: medium;"><span style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">लेखन</span></span></p><ul style="margin-bottom: 0px; margin-top: 0px; padding-inline-start: 48px;"><li aria-level="1" dir="ltr" style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; list-style-type: disc; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre;"><p dir="ltr" role="presentation" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"><span style="font-size: medium;"><a href="https://drive.google.com/file/d/1EhPU0scq_rGCbm2U0ExiOUFL3nJe2RAu/view" style="text-decoration: none;"><span style="background-color: transparent; color: #1155cc; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration-skip-ink: none; text-decoration: underline; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">चंदूचा मेंदू आणि शंभर शक्यता</span></a><span style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"> (२०१५)</span></span></p></li><li aria-level="1" dir="ltr" style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; list-style-type: disc; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre;"><p dir="ltr" role="presentation" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"><span style="font-size: medium;"><a href="http://www.rutugandha.com/?p=2763" style="text-decoration: none;"><span style="background-color: transparent; color: #1155cc; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration-skip-ink: none; text-decoration: underline; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">अनपेक्षित आपलंसं काही</span></a><span style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"> (२०१८)</span></span></p></li><li aria-level="1" dir="ltr" style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; list-style-type: disc; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre;"><p dir="ltr" role="presentation" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"><span style="font-size: medium;"><a href="https://www.mazamarathichabol.org/diwali/2020/vikral/" style="text-decoration: none;"><span style="background-color: transparent; color: #1155cc; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration-skip-ink: none; text-decoration: underline; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">विक्राळ महानगराच्या पाठीवर</span></a><span style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"> (२०२०)</span></span></p></li><li aria-level="1" dir="ltr" style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; list-style-type: disc; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre;"><p dir="ltr" role="presentation" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"><span style="font-size: medium;"><a href="https://www.sudharak.in/2020/01/2228/" style="text-decoration: none;"><span style="background-color: transparent; color: #1155cc; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration-skip-ink: none; text-decoration: underline; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">भारतीय पुरुष आणि लैंगिक सुखाचे व्यसन</span></a><span style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"> (२०२०)</span></span></p></li></ul><span style="font-size: medium;"><br /></span><p dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"><span style="font-size: medium;"><span style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">चित्रफिती</span></span></p><ul style="margin-bottom: 0px; margin-top: 0px; padding-inline-start: 48px;"><li aria-level="1" dir="ltr" style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; list-style-type: disc; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre;"><p dir="ltr" role="presentation" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"><span style="font-size: medium;"><a href="https://www.youtube.com/watch?v=0_tULWI0E3c" style="text-decoration: none;"><span style="background-color: transparent; color: #1155cc; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration-skip-ink: none; text-decoration: underline; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">मराठी शाळांपुढील आव्हाने आणि नावीन्यपूर्ण विषय</span></a><span style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"> भाग १</span></span></p></li><li aria-level="1" dir="ltr" style="background-color: transparent; color: black; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; list-style-type: disc; text-decoration: none; vertical-align: baseline; white-space: pre;"><p dir="ltr" role="presentation" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"><span style="font-size: medium;"><a href="https://www.youtube.com/watch?v=opzadwKA-ec" style="text-decoration: none;"><span style="background-color: transparent; color: #1155cc; font-family: Arial; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration-skip-ink: none; text-decoration: underline; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">मराठी शाळांपुढील आव्हाने आणि नावीन्यपूर्ण विषय भाग २</span></a></span></p></li></ul>सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-46417487232621028062021-01-24T08:16:00.002-08:002021-01-24T08:22:28.177-08:00'आलोक' : मुक्त नियतकालिक<div style="text-align: justify;"><br /></div><p style="text-align: left;"> मराठीला नियतकालिकांची मोठी परंपरा आहे. महाजालाच्या उदयानंतर चर्चापीठासारखा नवा प्रकार आकाराला आला. <a href="http://www.manogat.com/" target="_blank">मनोगत</a>, <a href="http://mr.upakram.org/" target="_blank">उपक्रम</a>, <a href="https://www.misalpav.com/" target="_blank">मिसळपाव</a>, <a href="http://aisiakshare.com/">ऐसी अक्षरे</a> ह्या चर्चापीठांनी मराठी ज्ञानव्यवहारात आणि साहित्यव्यवहारात मोलाची भर घातलेली आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. दैनिकांच्या महाजालीय आवृत्त्या आणि <a href="https://www.aksharnama.com/" target="_blank">अक्षरनामा</a>सारखी बहु-आशयी लेखस्थळे ह्यांमुळे महाजालावर मराठीचा वावर वाढतो आहे. <a href="https://www.hakara.in/" target="_blank">हाकारा</a>सारखं सर्जनशील लेखनाला वाहिलेलं नियतकालिक मराठीत वेगवेगळ्या आशयाची अभिव्यक्ती सुकर करू पाहत आहे. </p><p style="text-align: left;">ह्या सर्वांच्या जोडीला आता मराठीत '<a href="https://varnamudra.com/aalok/" target="_blank">आलोक</a>' हे नवीन महाजालीय मुक्त नियतकालिक अवतरतं आहे. <b>शास्त्रचर्चेस वाहिलेले पहिले मुक्त मराठी नियतकालिक</b> असं ह्या नियतकालिकाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की हे नियतकालिक <a href="https://varnamudra.com/aalok/parwana/" target="_blank">आलोक नित्यमुक्त परवान्या</a>-अंतर्गत वितरित करण्यात आलं आहे. ह्या नियतकालिकात प्रकाशित झालेली सर्व सामग्री मुक्त स्वरूपात (म्हणजे प्रत करून घ्यायला, प्रत करून इतरांना द्यायला, ह्या सामग्रीत बदल करून ती स्वतःसाठी वापरायला अथवा बदल केलेली सामग्री बदलांसह वितरित करायला प्रतिमुद्राधिकार-धारकांची मान्यता आहे. ह्यासाठी योग्य श्रेयनिर्दश करणे आणि बदलांसह सामग्री वितरित करताना ती ह्याच परवान्यांतर्गत वितरित करण्याची अट आहे.)</p><p style="text-align: left;">ज्ञान मुक्तपणे उपलब्ध करून देण्याची ही परंपरा मराठीत ह्याआधीही आहे. उदा. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे हे आपल्या पुस्तकांवर <b>कोणतेही हक्क राखलेले नाहीत</b> अशी सूचना छापत असत. पण ह्या मुक्त सामग्रीला वैधानिक स्वरूप देण्याची जी आधुनिक परंपरा रिचर्ड स्टॉलमन ह्यांनी सुरू केली आणि त्यामुळे केवळ मूळ सामग्रीच नव्हे तर तिच्यावर आधारित पुढील सर्व सामग्री-परंपरा मुक्त राहावी ह्यासाठी वैधानिक पद्धतीने परवाना देण्याची जी परंपरा सुरू झाली तिचं अनुसरण मराठीत होतं आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे.</p><p style="text-align: left;">ह्या कालिकात लेखांचं वैविध्यंही पाहण्यासारखं आहे. आधुनिक काळात ज्ञानशाखांतल्या सीमारेषा धूसर होत आहेत आणि वितळतही आहेत. अशा वेळी विविध ज्ञानशाखांवर मराठीत साधार आणि विद्याव्यवहारातील रूढ संकेतांना अनुसरणारं लेखन होत राहणं आवश्यक आहे. त्यामुळे आलोक ह्या नियतकालिकाचं स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !</p><p style="text-align: center;">आलोक ह्या नियककालिकाचं संकेतस्थळ : <a href="https://varnamudra.com/aalok/" target="_blank">https://varnamudra.com/aalok/</a></p><p style="text-align: center;">आलोक ह्या नियतकालिकाचं पहिलं पुष्प : <a href="https://varnamudra.com/aalok/pushpa/pahile/" target="_blank">https://varnamudra.com/aalok/pushpa/pahile/</a> </p><p style="text-align: center;"><br /></p><p style="text-align: center;">विशेष प्रकटीकरण :<br /></p><p style="text-align: justify;">(ह्या नियतकालिकाचे संपादक अस्मादिकांचे मित्र आहेत आणि ह्या नियतकालिकाच्या पहिल्या अंकात अस्मादिकांचं एक <a href="https://varnamudra.com/wp-content/uploads/2021/01/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4.pdf" target="_blank">टिपण</a>ही प्रकाशित झालं आहे.)<br /></p><p style="text-align: left;"> <br /></p><p style="text-align: left;"><br /></p><p style="text-align: left;"><br /></p><p style="text-align: left;"><br /></p><p style="text-align: left;"><br /></p><p style="text-align: left;"> </p>सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-6585302423292901852020-12-04T19:57:00.003-08:002020-12-04T20:44:26.021-08:00प्रश्न स्वातंत्र्याचा असतो !<div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><br /></div><p style="text-align: left;"> संगणकीय सामग्रीचं वैशिष्ट्य काय आहे? तर ही सामग्री सहज प्रतीकरणीय आहे. म्हणजे संगणकीय स्वरूपात साठवलेलं पुस्तक, ध्वनिमुद्रण, गाणं, छायाचित्र, चलच्चित्र, आरेखन अशी कोणतीही सामग्री असो. तिची प्रत करून घेणं हे सहज शक्य असतं. <br /><br />प्रतीकरणाच्या प्रयत्नातूनच मुद्रणतंत्र निर्माण झालं. पूर्वी पुस्तकाची प्रत हस्तलिखित स्वरूपात असे. ती यथामूल नकलून घेणं हे अतिशय कष्टाचं काम होतं. अनेक हस्तलिखितांच्या शेवटी हे कष्ट व्यक्त करणारे श्लोक आढळतात ते उगाच नाही. पण मुद्रणतंत्राने प्रतीकरण सोपं केलं आणि त्यामुळे वितरण सोपं होऊन प्रसारही सोपा झाला. ज्ञानेश्वरीच्या प्रती ज्ञानेश्वरांच्या काळी जितक्या असतील त्याच्या कैक पटीने आज उपलब्ध आहेत. ह्याचं कारण मुद्रणतंत्र आहे हे विसरून चालणार नाही.<br /><br />येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांनी येशूच्या कथा आणि त्याचा उपदेश ह्यांचा प्रचार मनःपूर्वक केला. त्याला कालांतराने ग्रंथरूप दिलं (शुभवर्तमान). अतिशय कष्टपूर्वक आणि प्रतिकूलतेशी झुंज देत त्यांनी आपला पंथ विस्तारण्याचा प्रयत्न केला. राजसत्तेचं साहाय्य मिळाल्याने हा प्रसार जरी बराच फोफावला असला तरी मुद्रणतंत्राच्या साहाय्याने तो जितका फोफावला त्याची तुलनाच करता येणार नाही. मुद्रणतंत्रामुळे येशूचं शुभवर्तमान देशोदेशी पसरलं. त्याची भाषान्तरं झाली, भाषान्तराच्या प्रती वितरित झाल्या. धर्मप्रसाराविषयी आपलं मत काहीही असो. पण प्रसारासाठी प्रतीकरणाचं तंत्र महत्त्वाचं ठरलं आहे ह्याविषयी मतभेद होण्याची शक्यता नाही. <br /> <br />पण प्रतीकरणाचं तंत्र एकटंच आलं नाही. तंत्रविद्येला भांडवल लागतं. मग भांडवलदार आले. गुंतवणूक आली. परताव्याचा विचार आला. नफ्याचा विचार आला. त्यामुळे मग प्रत कुणी करायची आणि कुणी नाही ह्याची भांडणंही आली. प्रतिमुद्राधिकार (कॉपिराइट) नावाची गोष्ट मुद्रणतंत्राच्या प्रसारानंतर दोन शतकांतच अस्तित्वात आली. प्रतिमुद्राधिकार म्हणजे प्रत करू देण्याचा अधिकार. एकीकडे ही तंत्रविद्या हे प्रचाराचं साधन होतं तर दुसरीकडे नफा मिळवण्याचं.<br /><br />अर्थात मुद्रणतंत्रावर बंधन होतं ते कुणी मुद्रण करावं (प्रती कुणी तयार कराव्या) ह्यासंदर्भात. वाचकांना तिचा फारसा त्रास नव्हता. आपण प्रत विकत घेतली की ती आपली झाली. मित्राला वाचायला हवी असेल तर ती सहज देता येत असे. एका मर्यादेत सामूहिक वाचनही करता येईल. म्हणजे मुद्रणतंत्रासह आलेल्या प्रतिमुद्राधिकाराने प्रतीकरणावर मर्यादा आणली. वाचनावर नाही.<br /><br />पण नफा ही फार आकर्षक गोष्ट असते. उत्पादनव्यवस्थेत मूल्य हे मागणी-पुरवठ्याच्या तत्त्वानुसार ठरतं. मागणी जास्त, पुरवठा कमी असं झालं तर मूल्य वाढतं. मागणी कमी पण पुरवठा जास्त असं झालं तर मूल्य घटतं. मग हुशार लोक ह्या गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी झटू लागले. पुरवठा कमी करण्याचा एक मार्ग हा पुरवठा कुणी करायचा ह्यावरच बंधन आणणं असा आहे. प्रत करायचा अधिकार मर्यादित केला की पुरवठ्यावर मर्यादा येणार. म्हणजे प्रत करायचा अधिकार असणाऱ्यांनाच पुरवठा करता येणार. त्यांनाच मूल्य ठरवता येणार. कारण प्रती पुरवणाऱ्यांमध्ये स्पर्धाच नसणार.<br /><br />प्रतीकरणाचं मुद्रणाचं तंत्र एकदा निर्माण झाल्यावर ते वेगवेगळ्या तऱ्हांनी विकसित होत राहिलं. पण त्यात मोठ्या प्रमाणावर प्रती करायच्या असतील तरच प्रती करणं सोयीचं होतं. एकच प्रत हवी असेल तर हे तंत्र वापरून प्रत करणं खर्चिक झालं असतं. पण तरी इतर स्वरूपात प्रती शक्य होतं. म्हणजे एखाद्या पुस्तकावर आधारित नाट्यनिर्मिती शक्य होती. प्रतिमुद्राधिकाराने ह्यावर जमेल तितका अंकुश ठेवण्याचा प्रयत्न झाला. साहित्य ही प्रतिभेची निर्मिती असते ही आपली पारंपरिक समजूत. प्रतिभा म्हणजे "अ-पूर्व-वस्तु-निर्माण-क्षमा प्रज्ञा". त्यामुळे अ-पूर्वतेला महत्त्व आलं. नवनिर्मिती महत्त्वाची ठरली. अशी निर्मिती करणारी व्यक्ती विशेष ठरू लागली. तिला वलय प्राप्त झालं. प्रतिमुद्राधिकार हा अशा व्यक्तीला दिलेला अधिकार होता. ह्यात दोन गोष्टी वादविषय ठरल्या.<br /><br />पहिली म्हणजे अ-पूर्वता. अपूर्वता म्हणजे नेमकं काय? ती खरंच निरवलंब स्वरूपाची असते का? ती परंपरेत निर्माण होत असेल तर ती परंपरेची निर्मिती नव्हे का? निर्मितीला विविध संबंध असतात. त्यामुळे अपूर्वताही सापेक्षच असते. काळाच्या विशिष्ट टप्प्यावर जे नवं वाटतं त्याची कारणपरंपरा कालौघात चालत आलेली असते. निर्मितीचं श्रेय नाकारता येत नाही. पण ही निर्मिती सर्वस्वी निरवलंब नसते. तिला परंपरेने आधार पुरवलेले असतात. <br /><br />दुसरा मुद्दा निर्मात्याला मिळालेल्या अधिकाराचा. प्रत्यक्षात हा अधिकार निर्मिती करणारी व्यक्ती वापरू शकत होती का असा प्रश्न आहे. निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला आपली निर्मिती ही क्रयवस्तू म्हणून बाजारात नेता येईलच असं नाही. निर्मितिप्रक्रिया ही गुंतागुंतीची असते.<br /><br />पुस्तकाचं उदाहरण घेतलं तर लेखिका ते लिहिते. पण हे लिहिलेलं वाचनयोग्य रूपात मांडावं लागतं. त्याला पुस्तकाचा आकार द्यावा लागतो. वेगवेगळे तंत्रवेत्ते त्या प्रक्रियेत सहभागी असतात. त्यासाठी जी संसाधनं लागतात. ही संसाधनं पुरवू शकेल अशी यंत्रणा निर्माण होते. उदा. प्रकाशिका इ. लेखिकेला वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशिकेचा प्रकाश आवश्यक ठरतो. मग प्रकाशिका तिचं पारिश्रमिक म्हणून लेखकेचा अधिकार स्वतःकडे घेते. म्हणजे अधिकार निर्माती म्हणून लेखिकेला मिळाला पण प्रत्यक्षात प्रकाशिकाच तो वापरते आहे असं झालं.<br /><br />प्रतीकरणाची प्रगती होत असताना एक टप्पा आला तो प्रतिरूपणाचा. छायाप्रतींचा. पुस्तकाची छायाप्रत करता येऊ लागली. एकच प्रत करता येणं शक्य झालं. कधी ती थोडी महाग पडे. पण मुद्रणाइतका खर्च येत नव्हता. पण प्रतीकरणातला हा टप्पा एका माध्यमापुरताच मर्यादित राहिला.<br /><br />आणि मग संगणक आले. आधी टेबलावर, मग मांडीवर आणि आता हातांतही. दृक्-श्राव्य अशा विविध प्रकारच्या सामग्रीची निर्मिती आणि वितरण हे संगणकामुळे शक्य झालं. त्याला देशांच्या मर्यादा राहिल्या नाहीत. विजेच्या साहाय्याने आणि विद्युद्वेगाने संपर्क होऊ लागले. देवाणघेवाण शक्य झाली. जे जग आपल्याला अलब्धच होतं ते सहज दिसू लागलं. ही यंत्र आधी महाग होती. खोलीएवढ्या विस्ताराची होती. मग त्यांचे आकार आणि किंमती आवाक्यात येऊ लागले आणि क्षमता मात्र भरमसाट वाढू लागली.<br /><br />संगणकांनी नवी आशा आणली. नवी संस्कृती आणली. संपर्काच्या मर्यादा उधळून लावल्या. हे विश्वचि माझे घरं ही ज्ञानोबांची उक्ती साकारलीच आहे असं वाटेल अशी परिस्थिती दिसू लागली. मानवी संस्कृतीचं युगानुयुगींचं संचित संगणकाच्या शून्यैकी संकेतात रूपांतरित होऊ लागलं. संकलित होऊ लागलं.<br /><br />ही परिस्थिती बाजाराला अनुकूलच होती. बाजारही संगणकावर आरूढ होऊन महाजालाच्या आधारे जगभर विस्तारला. मागणी आणि पुरवठा ह्यांना देशांच्या सीमा राहिल्या नाहीत. काय काय विकता येईल ह्याचाही विचार बदलला. जे पूर्वी विकता येईल असं वाटलंही नव्हतं तेही विकता येऊ लागलं. विदा (डेटा) नावाची नवी क्रयवस्तू आकाराला आली. माणसांच्या कृती ह्याच कच्चा माल झाल्या. त्यांच्या कृतींचं विदेत रूपान्तर करून विकता येतं आणि त्यांच्या आधारे माणसांच्या कृती नियंत्रितही करता येतात हे लक्षात आलं.<br /><br />माणसं संगणक वापरू लागली. त्यांच्या आयुष्याचा तो महत्त्वाचा घटक झाला. पण संगणक म्हणजे काय आणि संगणन म्हणजे काय ह्याचा विचार करणारे थोडेच होते. सोयीच्या नावाखाली मर्यादित संगणन करू देणाऱ्या गोष्टी जगाची 'खिडकी' म्हणून यंत्रात ठाण मांडून बसल्या. संगणकासोबत येणाऱ्या ह्या गोष्टी म्हणजे कार्यकारी प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम).<br /><br />संगणक म्हणजे गणिती-तार्किक क्रिया करून देणारं यंत्र. आपल्याला ज्या क्रिया त्याच्याकडून करवून घ्यायच्या असतील त्या करवून घेता येतात. त्यासाठी संगणकाला कोणत्या क्रिया कोणत्या क्रमाने करायच्या हे सांगणारी आज्ञावली (क्रमाने लिहिलेली आज्ञांची मालिका) पुरवावी लागते. ह्या आज्ञावल्यांनुसार संगणकाचं काम चालतं. एखाद्या यंत्रावर वेगवेगळ्या आज्ञावल्यांचा वापर शक्य करून देणारी आज्ञावली म्हणजे कार्यकारी प्रणाली. <br /><br />आज्ञावली कोणतीही असो तिचं एक रूप माणसांशी जोडलेलं असतं. म्हणजे आज्ञावली कशी लिहायची हे शिकलेल्या माणसांना समजेल आणि समजून घेता येईल अशा स्वरूपातली आज्ञावली म्हणजे आज्ञालेख (सोर्स कोड). आज्ञावलीचं दुसरं रूप यंत्राशी जोडलेलं असतं. माणसांना कळू शकणारा आज्ञालेख इथे शून्यैकी संकेतात रूपांतरित होतो. आता तो आज्ञालेख राहत नाही. तो केवळ यंत्रांनाच कळेल असा ०,१ ह्या दोन अंकचिन्हांच्या संयोग-क्रमयोगांची मालिका बनतो. त्याला यंत्रलेख म्हणता येईल. यंत्रलेख यंत्राकडून काम करून घेतो. पण त्यात नेमकं लिहिलंय ह्याची उकल करणं म्हणजे महाकठीण कर्म होऊन बसतं.<br /><br />वापरकर्त्यांना आज्ञावली ही आज्ञालेखाच्या स्वरूपात मिळाली तर वापरकर्ते आपल्याला हवे ते बदल त्या आज्ञावलीत करू शकतात. ती सुधारूही शकतात. पण जर आज्ञावली केवळ यंत्रलेखाच्या स्वरूपात असेल तर वापरकर्त्यांना ती मिळाली आहे तशी वापरणं ह्यापलीकडे काहीही करता येत नाही.<br /><br />आज्ञावलीवर नियंत्रण राहावं ह्या हेतूने केवळ यंत्रलेखाच्या स्वरूपात आज्ञावल्या उपलब्ध करून देण्यात येतात. त्यांना स्वामित्वाधीन (प्रोप्राय्टरी) आज्ञावल्या म्हणतात. वर उल्लेखलेली 'खिडकी' ही ह्या प्रकारातलीच. <br /><br />पण संगणक हे अशा कार्यकारी प्रणाल्यांद्वारेच वापरता येतात असं नाही. आज्ञालेख हेतुतःच पुरवून संगणन समजून घ्यायला न अडवणाऱ्या, सहकार्यशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यकारी प्रणाल्या आहेतच. त्यांना मुक्त आज्ञावल्या म्हणतात. पण ह्यांचे वापरकर्ते अद्याप मर्यादितच आहेत.<br /><br />कार्यकारी प्रणाली मुक्त आहे की नाही एवढाच प्रश्न आहे असं नाही. संगणन मुक्त राहू न देणारी संस्कृती हळूहळू फोफावत गेली.<br />"तुम्हाला पुस्तक वाचायचंय? वाचता येईल. त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील."<br />हेही आपण मान्य करायला हरकत नाही. <br />पण "हे पुस्तक वाचायला तुम्हाला आम्ही पुरवू तीच विशिष्ट आज्ञावली किंवा विशिष्ट यंत्रच वापरलं पाहिजे" असंही बंधन येऊ लागलं. पण ते बंधन सोय म्हणून दाखवण्यात आलं.<br />"आम्ही तुम्हाला पुस्तक वाचायची सोय करून देत आहोत. पण ती वापरण्यासाठी तुम्ही केवळ पैसे देऊन भागणार नाही. तुम्ही काही अटी मान्य करायला हव्यात. तुम्ही पुस्तक आम्ही सांगू तसंच (विशिष्ट यंत्रात किंवा विशिष्ट आज्ञावलीच्या साहाय्यानेच) वाचायला हवं. ही सोय आहे. पण हे यंत्र किंवा ही आज्ञावली नेमकं काय काय करू शकते हे तुम्हाला जाणून घेण्याचा अधिकार नाही. तुमची कोणकोणती माहिती ती गोळा करते हे आम्ही सांगू. पण तेवढीच माहिती गोळा करते ह्याची खात्री काय असं तुम्ही आम्हाला विचारता कामा नये. विचारून काही उपयोगही नाही. कारण ते यंत्र किंवा आज्ञावली वापरण्यासाठी आम्ही तुम्हाला देतो तेव्हाच तुम्ही हे मान्य केलेलं असतं की आम्ही केवळ आज्ञावली वापरू. पण ती कशी काम करते हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाही. तसा प्रयत्न आमच्याकडून झाल्यास आम्ही दरोडेखोर ठरू आणि दंडास पात्र होऊ." <br /><br />इतकी सगळी बंधनं कशासाठी आहेत? प्रतीकरण रोखण्यासाठी? संगणकीय सामग्रीचं जे वैशिष्ट्य आहे? तेच अडवण्यासाठी? केवळ तितकंच नाही. <br /><br />विदा ही गोष्ट विक्रीयोग्य आहे हे जाणवलेलं आहे. संगणक वापरणाऱ्या व्यक्ती आपले व्यवहार संगणकाच्याच आधाराने करत असतील तर त्यांच्या व्यवहारांविषयीची विदा अनिर्बंधपणे मिळवता येण्यासाठी संगणकीय व्यवहारावर नियंत्रण मिळवावं लागेल. म्हणजे वापरकर्ते संगणक वापरतील. पण त्यावर त्यांचं नियंत्रण कमीत कमी असेल अशा यंत्रणा निर्माण करण्यात येतात. असं करण्यासाठी संगणकीय व्यवहारांत जी यंत्रणा राबवतात तिला इंग्लिशेत डिजिटल-राइट-मॅनेजमेंट तथा डीआरएम अशी संज्ञा वापरण्यात येते. तिचं मराठीकरण करायचं तर संगणकीय-अधिकार-व्यवस्थापन तथा संअव्य असं करता येईल. वस्तुतः पाहिलं तर हे संअव्य म्हणजे संगणकीय-अडवणूक-व्यवस्थापन असतं. वापरकर्त्यांना संगणकीय सामग्री सहज वापरता येणार नाही अशा अडचणी पेरून ठेवणं, वापरकर्त्यांचं स्वातंत्र्य मर्यादित करण्याचे उपाय योजणं हे ह्या व्यवस्थांचं काम असतं. असं करण्यामागे विविध कारणं असतात. मुख्य कारण हे नफा कमावणं हे असतं. त्यासाठी यंत्र (हार्डवेयर) किंवा आज्ञावली (सॉफ्टवेयर) ह्यांचा वापर करण्यात येतो.<br /><br />तेव्हा संअव्य ही व्यवस्था वापरकर्त्यांवर अनावश्यक बंधनं घालणारी, त्यांचं स्वातंत्र्य मर्यादित करणारी व्यवस्था आहे. तिच्या नावात जरी अधिकाराचा उल्लेख असला तरी तिचा हेतू अडवणूक करणं हाच आहे. कारण ह्या व्यवस्थांच्या वापराविनाही ते संगणकीय व्यवहार शक्य आहेत. उदा. संगणकीय पुस्तक वाचता येण्यासाठी एखाद्या संअव्य वापरणाऱ्या विशिष्ट आज्ञावलीची आणि तिला लागणाऱ्या विशिष्ट स्वरूपातील पुस्तकाची आवश्यकता नाही. इपब-सारख्या मुक्त स्वरूपात इ-पुस्तके तयार करता येतात आणि ती वाचण्यासाठी वेगवेगळ्या मुक्त आज्ञावल्यांपैकी कोणतीही आज्ञावली वापरली तरी चालते.<br /><br />उदा. संअव्य वापरून जी पुस्तकं वाचायला मिळतात ती आपल्याला आपल्या मित्रांना देता येत नाहीत. कारण प्रतीकरण शक्य नाही. मुद्रित पुस्तकांपेक्षा संगणकीय पुस्तकाचं प्रतीकरण सहज शक्य आहे. पण ते इथे ते अडवण्यात येते. <br /><br />संअव्य वापरून ज्या गोष्टी वापराव्या लागतात त्यांत प्रतीकरणच अडवण्यात येते असे नाही. वापरकर्त्यांची विविध प्रकारची माहिती ती आज्ञावली वा ते यंत्र संकलित करत असू शकते. पण ते नेमके काय करते आहे हे वापरकर्त्यांना कळण्याची सोय नसते. कारण ते यंत्र नेमके काय करते वा ती आज्ञावली काय करते हे पाहण्याची सोय वापरकर्त्यांना उपलब्ध नसते. त्यामुळे वापरकर्ते अगतिक असतात. <br /><br />संअव्ययुक्त गोष्टी मुक्त नसल्याने त्या वापरकर्त्यांच्या नकळत त्यांच्या यंत्रांत वा आज्ञावलीत परस्पर बदल घडवून आणू शकतात. उदा. एका प्रसिद्ध उद्योगसमूहाने आपल्या वापरकर्त्यांच्या वाचनयंत्रांतून ऑरवेलच्या १९८४ ह्या कादंबरीच्या प्रती परस्पर उडवून टाकल्या. <br /><br />संअव्यच्या समर्थनार्थ वेगवेगळे युक्तिवाद करण्यात येतात. त्यातला एक म्हणजे संअव्यमुळे प्रतिमुद्राधिकाराचे रक्षण होते हा आहे. प्रतिमुद्राधिकाराचा उद्देश प्रतीकरण मर्यादित करणे असा आहे. म्हणजे प्रतीकरण प्रतिमुद्राधिकारधारकाच्या अनुमतीनेच व्हावे असा आहे. प्रतिमुद्राधिकाराचा भंग झाल्यास शिक्षेची तरतूद असते. प्रतिमुद्राधिकार त्यावेगळ्या वापरावर नियंत्रण ठेवत नाही. संअव्यमुळे वापरकर्त्यांवर अतिरिक्त बंधने येतात. ती अनावश्यक असतात.<br /><br />संअव्यमुळे प्रतिमुद्राधिकार अबाधित राहतो असं नाही. ज्या कुणाला अनधिकृतरीत्या प्रत करून घ्यायची आहे ते ह्या व्यवस्थांचा वापरच करणार नाहीत आणि ज्यांना अनधिकृत वापर करायचा नाही त्यांना ह्या व्यवस्था वापरल्यामुळे अनावश्यक बंधनांना सामोरे जावं लागतं. आपल्या स्वातंत्र्याचा संकोच करून घ्यावा लागतो. संअव्य वापरून प्रतिमुद्राधिकाराचं रक्षण होतं असं म्हणणं हे "साक्षर व्हा" असे फलक लिहिण्याइतकंच हास्यास्पद आहे. ज्यांना ते वाचता येणार नाहीत (म्हणजे जे निरक्षर आहेत) त्यांच्यासाठी तो संदेश लिहिलेला आहे आणि जे संदेश वाचू शकतात (म्हणजे जे साक्षर आहेत) त्यांना त्या संदेशाची आवश्यकताच नसते.<br /><br />संअव्यचा वापर केला नाही तर निर्मात्यांना आपल्या कलाकृतीचं मोल मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्या निर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल असा युक्तिवाद अनेकदा करण्यात येतो. पण संअव्य न वापरताही निर्मात्यांना आपल्या कलाकृतीचा उचित मोबदला मिळणं शक्य आहे. अनेक लेखक आपली पुस्तके अशा पद्धतीने वितरितही करत असतात. ही पद्धती अद्याप फारशी रूढ झालेली नसली तरी जोम धरते आहे. अनेक प्रकाशकही आपण संअव्यमुक्त पुस्तकं विकतो असे सांगताना आढळतात. (उदा. <a href="https://www.smashwords.com/about/supportfaq#drm">https://www.smashwords.com/about/supportfaq#drm</a> आणि <a href="https://leanpub.com/theoldleanpubmanual/read">https://leanpub.com/theoldleanpubmanual/read</a>) उलट संअव्यचा वापर राबवण्याची यंत्रणा ही सामान्यतः प्रत्यक्ष निर्मात्यांकडे नसतेच. ती प्रकाशकांकडे वा वितरकांकडे असते. </p><p style="text-align: left;"><br />संअव्यचा वापर टाळायला हवा कारण ही व्यवस्था मुक्त आज्ञावल्यांचा वापर करत नाही हे तर्कतःच स्पष्ट आहे. ती वापरकर्त्यांवर बंधन घालते. त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच करते. त्यामुळे शक्य तितकी ही गोष्ट टाळायला हवी.<br /><br /><br />संअव्य टाळण्यासाठी काय काय करता येईल?<br /><br />ज्यांत विशिष्ट आज्ञावली वा विशिष्ट यंत्राचाच वापर आवश्यक आहे अशा गोष्टी शक्य तितक्या टाळाव्या. त्यांऐवजी मुक्त स्वरूपात असणाऱ्या गोष्टी वापराव्या. उदा. संगणकीय पुस्तकांसाठी इपब अथवा पीडीएफ अशा विशिष्टच एका आज्ञावलीवर आधारित नसलेल्या स्वरूपांची निवड करावी.<br /><br />ह्या विषयावरील अधिक माहितीसाठी फ्री सॉफ्टवेयर फाउंडेशनचे संअव्यविरोधी चळवळीचे संकेतस्थळ (<a href="https://www.defectivebydesign.org/">https://www.defectivebydesign.org/</a>) पाहता येईल. ह्या संकेतस्थळावरील (<a href="https://www.defectivebydesign.org/guide">https://www.defectivebydesign.org/guide</a>) हा विभाग बराच उपयुक्त आहे. प्रस्तुत लेखात ह्या संकेतस्थळावरील माहितीचा साभार उपयोग केला आहे.<br /><br />दि. ०४ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय संअव्यविरोधी दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने हे लहानसे टिपण लिहिले आहे.<br /><br />प्रतिमुद्राधिकार, शर्विलकी (पायरसी) ह्यांबाबत एका लेखकाचं मत.<br /><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><iframe allowfullscreen="" class="BLOG_video_class" height="266" src="https://www.youtube.com/embed/0Qkyt1wXNlI" width="320" youtube-src-id="0Qkyt1wXNlI"></iframe></div><br />सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-36187632845712625742020-05-14T09:46:00.001-07:002020-05-14T10:12:45.724-07:00'मराठी लेखन-कोश'कार श्री. अरुण फडके ह्यांचं निधन<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
अरुण फडके गुरुजी गेले. त्यांच्या मराठी लेखन-कोशाने मराठी प्रमाण/ शुद्ध लेखनाच्या क्षेत्रातली एक मोठी उणीव भरून काढली. अमुक शब्द कसा लिहायचा ह्यावर अडलेल्या व्यक्तीला सहज वापरता येईल असं संदर्भसाधन उपलब्ध झालं. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रमाण/ शुद्ध लेखनाच्या नियमावल्यांना मर्यादा असतातच. पण तरी त्यांचा उपयोग होतो. पण तो उपयोग करून घ्यायलाही काही तयारी करावी लागते. ती सर्वसामान्यांच्या सहज आवाक्यातली नसते. लेखनकोशासारखं संदर्भसाधन अशा प्रसंगी कामी येतं. पण असं साधन तयार करणं हे सोपं नाही. प्रमाण/ शुद्ध लेखन ही लोकव्यवहारावर आधारलेली गोष्ट आहे. तिला अनेक अवधानं सांभाळावी लागतात. लेखनपरंपरा, व्याकरण, व्युत्पत्ती, अर्थभेदकता इ. ह्या गोष्टींचं आपापसात सगळंच जुळतं असंही नाही. त्यामुळे एकाच निकषाने सगळं बांधता येत नाही. फाटे फुटत राहतात. अशा परिस्थितीत फडके ह्यांच्या लेखन-कोशातल्या काही रूपांविषयी मतभेद होणं ही गोष्ट स्वाभाविकच मानली पाहिजे. पण त्यामुळे त्यांचं श्रेय उणावत नाही.<br />
<br />
फडके ह्यांची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मराठीच्या लेखननियमांचा अभ्यास करून रूढ नियमावलीवर आधारित असा लेखनकोशच केला नाही तर त्या रूढ नियमावलीतल्या उणिवांचा धांडोळा घेऊन त्या उणिवांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्नही करून पाहिला. त्यांच्या भाषेत, "मराठीच्या प्रकृतीशी सुसंगत" असे नवे लेखननियम तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ह्याबाबतच्या त्यांच्या अनेक भूमिकांशी मी सहमत नव्हतो आणि नाही. पण तरीही अभ्यासक म्हणून त्यांच्या ह्या वृत्तीचं कौतुक केल्यावाचून राहवत नाही. त्यांच्या नव्या नियमावलीच्या प्रयत्नांनी मराठीच्या लेखनसरणीतले अनेक प्रश्न लक्षात यायला साहाय्य झालं हे मात्र नोंदवणं आवश्यक आहे.<br />
<br />
मराठी लेखन-कोशाच्या रूपात त्यांचा प्रथम परिचय झाला. एम. ए.च्या वर्षांत कार्यशाळेच्या निमित्ताने त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि ओळखही झाली. त्यांच्या कार्यशाळेत शिकल्याने माझ्या लिहिण्यात बराच नेटकेपणा आला हेही नोंदवलं पाहिजे. वाचन, विचार ह्यांनी आपण बदलत राहतो. त्याप्रमाणे त्यांची अनेक मतं पटत नव्हतीही. एका इ-टपाल-गटावर त्यांच्याशी प्रदीर्घ वाद-चर्चाही झडली. त्या चर्चेने खूप वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करता आला.<br />
<br />
एक अनुभव नोंदवणं अतिशय आवश्यक आहे. मराठीच्या नव्या लेखननियमांसंदर्भात मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या एका बैठकीत मला आमंत्रित करण्यात आलं आणि त्यासाठी अरुण फडके ह्यांनी माझं नाव सुचवलं होतं असं मला कळलं. ही घटना इ-टपाल-गटावरच्या वादचर्चेनंतरची आहे. माझी अनेक मतं त्यांच्या मतांशी जुळणारी नाहीत हे स्पष्ट असतानाही त्यांनी माझं नाव सुचवलं होतं. ही गोष्ट कृतज्ञतापूर्वक नोंदवणं आवश्यक आहे. असं करायला मनाचं मोठेपण लागतं. ज्ञानव्यवहारात वादपरंपरा अटळ असते. पण तिचं औचित्य आणि तिच्या मर्यादा ह्या दोहोंचं भान असणं महत्त्वाचं असतं. आज त्यांच्या जाण्याने ही स्मरणं मनात येत राहतात. त्यांच्या स्मृतीलाच नव्हे तर कृतीला, निष्ठेला आणि कष्टांनाही विनम्र अभिवादन.</div>
</div>
सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-63404098303397196982016-07-06T11:22:00.004-07:002016-07-06T11:50:17.996-07:00नावात बरेच काही आहे... आणि त्यावेगळेही बरेच काही आहे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
०१.
ज्या ज्या ठिकाणी अजूनही बॉम्बे असे नाव रूढ आहे आहे तिथे मुंबई असे नाव
वापरणे योग्य आहे हे माझे स्पष्ट मत आहे. अशा सुधारणांना विरोध का व्हावा
हे मला कळत नाही. माझा एक मित्र काही कारणांनी माझे नाव चुकीचे उच्चारतो
म्हणून मी माझे नाव सुधारून सांगू नये ह्यात कोणता शहाणपणा आहे हे मला
कळलेले नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br />
०२.
बॉम्बेचे मुंबई झाले/ केले ही मांडणीच चुकीची आहे. ब्रिटिश
येण्यापूर्वीपासून मुंबई हे नाव आहे. ब्रिटिशांनी त्यांच्या उच्चाराप्रमाणे
ते लिहिले. ते गेल्यावर मुंबई हा उच्चार आणि लेखन माहीत असणारे लोक
सत्तेवर आले. ते येऊनही काही वर्षे बॉम्बे हे नाव काही ठिकाणी चालत होते.
यथावकाश सगळीकडे मुंबई अशी सुधारणा झाली. हेच मद्रास, कलकत्ता इ. बाबत
झाले. काही पक्षांनी ह्याबाबत आपली पाठ थोपटून घेतली. काही विरोधकांनी
आक्षेप घेतले. शिवीगाळही केली. पण ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी चुकीच्या
कारणासाठी केल्या आहेत. सोम्याचे नाव एखादा तोतरा मनुष्य तोम्या असे
उच्चारत असेल आणि त्याला अनुसरून इतरही तोम्या असे उच्चारू लागले. त्यामुळे
सोम्याचे नाव तोम्या होत नाही. लोक तोम्याऐवजी सोम्या म्हणू लागले हा बदल
नाही सुधारणा आहे हे लक्षात न घेता पाठ थोपटून घेणे किंवा आक्षेप घेणे
निरर्थक आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
०३.
ब्रिटिश राजवटीच्या परंपरेतून जो विधिव्यवहार आणि न्यायव्यवहार भारतात रूढ
झाला त्यात तयार झालेल्या व्यवस्थांत आणि अधिनियमांत काही ठिकाणी बॉम्बे
असे नाव मुंबईऐवजी वापरात आहे. नव्या विधिव्यवस्थेच्या नियमानुसार काही
अधिनियम किंवा अध्यादेश काढून बॉम्बेऐवजी मुंबई अशी सुधारणा करण्यात येत
असेल तर ते मला मान्य आहे. त्यासाठी कुणी सक्रिय प्रयत्न करत असेल तर माझा
त्यांना पाठिंबा आहे. अट इतकीच की त्यांनी हा बदल आहे असे न म्हणता ही
सुधारणा आहे हे स्पष्ट केले पाहिजे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
०४.
नाव सुधारल्याने/ बदलल्याने काय होणार? हा नामी मुद्दा मांडण्यात येतो.
नावे बदलणे भावनिक आहे असे हिणवण्यात येते. नावे बदलून काही होत नाही ही
बाब सर्वस्वी खरी नाही. नाव बदलल्याने नाव बदलते एवढा (काही वेळा एवढाच)
परिणाम होतो. ही उघड बाब आहे. तरी नाव बदलण्याची प्रथा आहे. ब्रिटिश
गेल्यावर भारताचा झेंडा बदलला. (इतकेच कशाला आजही एका भारतीय पक्षाचा झेंडा
दुसऱ्याला चालत नाही. भाजपावाले लाल बावटा लावणार नाहीत आणि माकपवाले भगवा
फडकवणार नाहीत.) हा झेंडा बदलल्याने जो (आणि जितका) फरक पडलेला आहे तितकाच
फरक नावे बदलल्याने होतो. मराठवाड्यात विद्यापीठाच्या नामांतरासाठी
(नावातील सुधारणेसाठी नव्हे) एक पिढी लढत राहिली. शेवटी ते नाव बदलण्यातही
आले. नावे बदलून जेवढा फरक पडतो तेवढा ह्या उदाहरणातही पडला आहे. चर्चा
केल्याने जेवायला मिळत नाही. म्हणून चर्चा निरर्थक ठरत नाहीत. जेवण
मिळवण्यासाठी श्रम करावेच लागतात. चर्चांचे फलित वेगळे असते. श्रमांचे
वेगळे. तेव्हा केवळ भावनिक म्हणून हिणवण्यानेही काही फरक पडत नाही. नावे
बदलणे भावनिक असतेच. ते भावनिकच असेल तर भावनिक गोष्टीं दुर्लक्षणीय
मानणाऱ्यांनी त्यावर इतकी चर्चा कशाला करावी? आंब्याच्या झा़डाला पेरू लागत
नाहीत म्हणून आंबे लावणे निरर्थक ठरवणे एक तर मूर्खपणाचे आहे किंवा लबाडीचे
आहे.<br />
<br />
०५. नावे सुधारणे/ बदलणे हे करणे पुरेसे नाही हे
आपल्याला माहीतच अाहे. मग नावे बदलण्याव्यतिरिक्त जे करायचे ते आपल्या
परीने करत राहावे. नावे सुधारल्याने/ बदलल्याने काही होत नाही असे म्हणत
नावे सुधारण्याला/ बदलण्याला विरोध करणे हे ढोंगीपणाचे आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
०६.
वरील मजकूर लिहिण्याला कारण घडलेली घटना म्हणजे उच्च न्यायालयांच्या
नावांत केंद्रीय शासनाने (त्याच्या मते) केले बदल. माझ्या मते हा बदल नसून
सुधारणा आहे. असो. पण शासनाने अजूनही एक महत्त्वाचे काम करणे आवश्यक आहे. <b>
मुंबई उच्च न्यायालय असे नाव जरी असले तरी ह्या उच्च न्यायालयात राज्याच्या
राजभाषेलाच -- मराठीलाच -- प्राधिकृत भाषा म्हणून मान्यता नाही. हा
नागरिकांवर अन्याय आहे. मराठीला प्राधिकृत भाषेचा दर्जा मिळाला तर उच्च
न्यायालयात मराठी कागदपत्रांची इंग्लिश भाषांतरे करून द्यावी लागणार नाहीत.
राज्याच्या राजभाषेला उच्च न्यायालयात प्राधिकृत भाषा म्हणून मान्यता नसणे
हे लोकनियुक्त प्रतिनिधीला विधिमंडळात मते मांडण्यास अटकाव करण्यासारखेच
अन्याय्य आहे. सर्व पक्षांच्या लोकनियुक्त प्रतिनिधींनी राजभाषेवरील हा
अन्याय दूर करण्यासाठी एकत्र यायला हवे. राजभाषेला उच्च न्यायालयाची
प्राधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळावी ह्यासाठी लढा उभारणाऱ्या लोकांना
सर्व नागरिकांनी पाठिंबा द्यायला हवा. हा अन्याय दूर करायला हवा.</b></div>
</div>
सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-63742037295512761482015-10-09T13:40:00.000-07:002015-10-09T13:41:30.867-07:00मराठी-ग्रंथ-सूचिकार श्री. शरद केशव साठे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
आज (०९ ऑक्टोबर २०१५) दुपारी एक दुःखद वार्ता कळली. मराठी-ग्रंथ-सूचिकार श्री. शरद केशव साठे
काही दिवसांपूर्वी कालवश झाल्याची. १८०० ते १९५० ह्या काळातील मराठी
ग्रंथांची विषयवार सूची करून ह्या सूचिकार्याची पायाभरणी श्री. शंकर गणेश
दाते ह्यांनी केली. राज्य मराठी विकास संस्थेने ह्यापुढील कालखंडातील १९५१
ते १९९० ह्या कालखंडातील मराठी ग्रंथांची विषयवार सूची करण्याचे काम साठे
सरांकडे सोपवले होते. ते साठे सरांनी पूर्ण करत आणले होते. त्यातल्या
शेवटच्या ५ वर्षांच्या कालखंडाचे काम सर करत होते. पण दुर्देवाने ते पूर्ण
होऊ शकलेले नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
१९५१ ते १९८५ ह्या ३५ वर्षांत प्रकाशित झालेल्या
मराठी ग्रंथांची विषयवार सूची साठे सरांनी ४ भागांत (मराठी ग्रंथसूची भाग ३
ते ६ ) तयार केली. ह्यासाठी मुख्य आधार त्यांनी घेतले ते कोलकात्याच्या
राष्ट्रीय ग्रंथसूचीचे (नॅशनल बिब्लिओग्राफीचे) खंड आणि मुंबईच्या
एक्झामिनर ऑफ बुक्स ह्यांच्या तालिकांचे तिमाही अंक ह्यांचे. मुंबई मराठी
ग्रंथसंग्रहालय, दादर आणि मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे ह्यांच्या
दाखल-नोंद-वह्यांचाही पूरक वापर त्यांनी केला.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अभ्यासकांना आपल्या
क्षेत्रात आधी काय काम झाले आहे ह्याची माहिती करून घेण्यासाठी
ग्रंथसूचीसारखे साधन उपयोगी ठरते. ग्रंथसूचीतील ग्रंथवर्णन ह्या भागात
ग्रंथांच्या माहितीची विषयवार मांडणी केलेली असते. त्यानंतर लेखक,
ग्रंथनाम, विषय, प्रकाशक, प्रकाशनस्थळ, अनुवादित ग्रंथ ह्यांसारख्या
निर्देशसूची नेमका ग्रंथ हुडकायला साहाय्य करतात. संगणकपूर्व काळातील
विदागार (डेटाबेस) रचण्याचे हे काम आहे. अत्यंत निष्ठापूर्वक सातत्याने हे
काम सरांनी केले. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ह्याव्यतिरिक्त अमृतानुभवाचा पदसंदर्भकोश,
ज्ञानेश्वरीची ओवीसूची (मुंबई विद्यापीठाच्या 'ज्ञानदेवी' खंड ३ मध्ये
समाविष्ट), ज्ञानेश्वरपंचकाच्या (ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ, सोपानदेव,
मुक्ताई, चांगदेव) अभंगांची चरणसूची आणि शब्दसूची ह्यासारखी कामेही सरांनी
केली. पदसंदर्भकोशात ग्रंथात आलेल्या प्रत्येक शब्दाची नोंद असते तो
ग्रंथात कुठे आला आहे ह्याचा पत्ता दिलेला असतो आणि तो शब्द ज्या ओळीत
वापरलेला आहे त्या ओळीचा मजकूरही दिलेला असतो. त्यामुळे शब्दाच्या वापराचा
संदर्भ त्वरित कळून येतो. इतकेच नव्हे तर ग्रंथातील पुनरुक्त शब्द, त्यांची
वारंवारता, ग्रंथातील अनन्य शब्द ह्यांचीही माहिती मिळते. मराठी
ग्रंथसूचीचे काम हाती घेण्यापूर्वी केलेली ही कामे करायला ११ वर्षांत
सुमारे ७००० तास लागल्याचा उल्लेख सरांनी आपल्या एका लेखात केला आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
विविध
तऱ्हेचे सूचिकार्य हा सरांचा ध्यास होता. बॅंकेतील नोकरीतून
स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी १९५० ते १९९० ह्या कालखंडातील मराठी
ग्रंथसूचीचे काम स्वीकारले. सातत्य, चिकाटी आणि परिश्रम ह्या गुणांच्या
आधारे ते काम बऱ्यापैकी पूर्ण केले. मराठी ग्रंथसूचीच्या ६व्या खंडाला
त्यांनी ग्रंथकार-अल्पपरिचय-कोश जोडला आहे. त्यासाठी त्यांनी विविध
साधनांतून माहिती गोळा केली. लेखकांची जन्म-मृत्यु-वर्षे, हयात लेखकांचे
पत्ते व संपर्कक्रमांक मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार केला. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सूचिकार्यासारखे
मोजक्या अभ्यासकांना उपयोगी पडणारे आणि त्यांचे कितीतरी श्रम वाचवणारे
कार्य त्यांनी सातत्याने केले. हे अर्थातच फारशी प्रसिद्धी मिळवून देणारे
काम नव्हे. पण ते किचकट काम सर प्रसिद्धीची आस न बाळगता निरलसपणे करत
राहिले. ते १ ऑक्टोबर २०१५ रोजी कालवश झाले. त्याची वार्ताही आज कळली.
प्रसारमाध्यमांना ही माहिती पोचली की नाही कुणास ठाऊक? असो.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
कालाय तस्मै नमः ।</div>
</div>
सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-5173741228398432322014-08-18T11:20:00.000-07:002014-08-18T21:29:52.949-07:00उत्सव बहु थोर होत...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
अमुक उत्सवाचा उद्देश कोणता? किंवा 'खरा' उद्देश कोणता? ह्या प्रश्नांना खरंच काही अर्थ असतो का? उत्सवांचा वापर विविध मंडळी आपापल्या हेतूंसाठी करून घेत असतात. हे केवळ धार्मिक उत्सवांनाच लागू नाही. इतरही उत्सवांचं तेच आहे. अनेकांना हे उत्सव हवे असतात. गोंगाट, ध्वनिवर्धकांचा ढणढणाट, उन्मादी नृत्यं, अगदी दोन्ही प्रकारचं दारुकामसुद्धा!</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
कदाचित ह्यामागे काही स्वाभाविक मानवी प्रेरणा असतील. दैनंदिन रहाटगाडग्यातून सुटका म्हणून हा उत्सवी उतारा असेल. काहीही असेल. पण हे उत्सव आपल्या सामाजिक जगण्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. बाजार हा जर आपल्या सगळ्याच जगण्यात महत्त्वाचा ठरत असेल तर उत्सवावर त्याचा परिणाम होऊ नये ह्या अपेक्षेला काय अर्थ आहे? उत्सव हे बाजाराला सोयीचेच असतात. मागणी निर्माण झाली की पुरवठ्याची सोय होतच असते.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
समाजही एकसंधपणे उत्सव साजरे करत नाही. काही उत्सव 'आपले' असतात. काही उत्सव 'त्यांचे'. त्यामुळे 'त्यांच्या' उत्सवाला नावं ठेवत 'आपले' उत्सव साजरे करत राहण्याची उत्तम सोय उपलब्ध असते. उत्सव हा 'संस्कृती'चा आविष्कार असतो. त्यामुळे संस्कृती जपण्यासाठी ते साजरे करावेच लागतात. कोणती संस्कृती केव्हा अंगीकारायची ह्याचं स्वातंत्र्यही आपल्याला असतंच. त्यामुळे 'पाश्चात्त्य' संस्कृतीला नावं ठेऊन आपण ३१ डिसेंबरच्या रात्री धिंगाणा घालायला मोकळे असतो. फुले, आगरकर, आंबेडकर ह्यांचं नाव घेत आपल्याला उंचच उंच थरांच्या दहीहंड्या बांधायला कसलीच अडचण नसते. पवित्र धार्मिक उत्सव असं म्हणून मग त्याच्या नावावर दारू पिऊन, बीभत्स हालचालींची नृत्यं करायला काहीच आडकाठी नसते. थोरांच्या जयंत्या/ मयंत्या साजऱ्या करायला विचारांची आवश्यकता नसते. दिवसभर ध्वनिवर्धक ढणढणत असले. मिरवणुका आणि मंडप बांधून वाहतुक अडवता आली की ते पुरेसं असतं. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आपली सामाजिक जाणीव इतकी जागृत असते की कोणतीही नियमावली नसलेले जीवघेणे 'खेळ' आपण आयोजित करतो आणि खेळणाऱ्यांच्या जिद्दीचं आणि मेहनतीचं कौतुक करत बघायला मोठ्या संख्येने उपस्थित राहतो. टाळ्या वाजवतो. यशस्वी होणाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. थर लावणाऱ्या गोविंदांवर पाणी भरलेले फुगे मारताना मजा येते हे नाकारण्यात काय अर्थ आहे? आपला फुगा बसून थर कोसळला तर जेवढी मजा येते तितकंच कुणी थरावरून पडून घायाळ झालं किंवा कुणाला जीव गमवावा लागला तर व्यक्त होणारी आपली हळहळ ही खरी नसते असंही म्हणता येणार नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
उंचच उंच थर लावणाऱ्या गोविंदांचं कौशल्य, त्यांनी घेतलेले कष्ट हे खरेच असतात. त्यांचा उत्साह, त्यांचं साहस नाकारता येईल का? मंडळं इतके कष्ट घेऊन पोरं जमवतात. त्यांना थोडी (काही लाखांची!) बक्षिसं मिळाली तर त्यात वावगं काय आहे? कोणता खेळ सर्वस्वी सुरक्षित असतो? आणि साहसी खेळ हे अपघातप्रवण असणारंच. गोविंदांना ते माहीतच असतं. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
जिथे इतक्या मोठ्या संख्येने लोक जमा होतात तिथे आपली पोळी भाजायचा काही जण प्रयत्न करणारच. मग सबंध परिसराला दुधाच्या पिशव्या पुरवल्या जातात. कृष्णाचा उत्सव असल्याने दही, दूध हवंच ना! मग छानछान नटनट्या आपलं कौशल्य घेऊन रंगमंचावर (व्यासपीठ, रंगमंच ह्या वेगवेगळ्या शब्दांपेक्षा ष्टेज हा शब्द सोयीचा आहे.) अवतरतात. भक्तिगीतं, प्रेमगीतं, लावण्या, डिस्को, रॅप अशा विविध कलाप्रकारांचं एकत्रित सादरीकरण होतं. त्यात 'आज गोकुळात रंग खेळतो हरी' आणि 'शीला की जवानी' एकत्र आली तर नाकं कशाला मुरडायची? सगळा सोवळेपणा आपोआप मोडून पडलेला असतो. 'समाधि से संभोग तक' आणि 'संभोग से समाधि तक' काहीही क्षणाच्या अवकाशाने उपस्थित होऊ शकतं. आयोजक असलेले भाऊ/ दादा/ अण्णा/ आप्पा इ. दिवसभर उभे असतात. ध्वनिक्षेपक हातात घेऊन उत्साहाने बोलत असतात. आलेले 'ख्यातकीर्त' त्यांच्या गुणांचं तोंड भरून कौतुक करतात. त्यांचा प्रचार आपसूकच होतो. लोकांनाही फुकट कार्यक्रम बघायला मिळतात. दुधाच्या पिशव्या मिळतात. मग हे सर्व आयोजित करायला इतका पैसा कुठून येतो ह्याचा विचार कशाला हवा? </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अशा अनेक सोयी उपलब्ध असणाऱ्या गोष्टींत सुधारणा करणं सोपं नाही. कारण सुधारणा करू इच्छिणारे सर्व एकसारखे नसतात. त्यांचेही वेगवेगळे हेतू असणार. पण ह्या सर्व क्रियाप्रतिक्रियांतून काही बदल घडून येतील. त्यांमुळे काहींच्या सोयी कमी होतील. पण काही चांगल्या गोष्टीही घडू लागतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
विविध प्रेरणांनी घडून येणाऱ्या गोष्टींमध्ये काही जणांना आरोपी करून आपण मोकळं होणं सोपं आहे. पण तेवढंच करून फार काही चांगलं घडेल अशी अपेक्षा नाही. अनेक विचार, अनेक हेतू, अनेक हितसंबंध ह्यांच्या परस्परक्रियेतून जे घडायचं ते घडणार आहे. आपल्या म्हणण्यात कोणतेही हितसंबंध, हेतू, विचार नसतीलच असही नाही. मात्र आपण आपल्याला जितका विचार करता येतो तितका प्रामाणिकपणे करून त्यानुसार वागायचं ठरवलं आणि ते शक्य तसं वर्तनात आलं तरी ते उपयोगी ठरेल.</div>
</div>
सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-45961957329884318052014-02-22T10:50:00.000-08:002014-02-22T10:55:03.215-08:00महाराष्ट्र-राज्य-साहित्य-आणि-संस्कृति-मंडळाची प्रकाशने<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
महाराष्ट्र-राज्य-साहित्य-आणि-<wbr></wbr>संस्कृति-मंडळाची प्रकाशने आता
महाजालावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध झाली आहेत. खालील दुव्यावर मंडळाची ४४४
पुस्तके पीडीएफ स्वरूपात दिलेली आहेत.<br />
<div class="gmail_default">
<br />
<a href="http://mahasahityasanskriti.in/download.html" target="_blank">mahasahityasanskriti.in/<wbr></wbr>download.html</a><br />
<br /></div>
</div>
सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-17643307898848276222013-08-19T23:42:00.003-07:002013-08-20T01:09:10.450-07:00डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या<script language="JavaScript">
<!-- This script and many more are available free online at -->
<!-- The JavaScript Source!! http://javascript.internet.com -->
<!-- Author: www.cgiscript.net -->
<!-- Begin
// Get today's current date.
var now = new Date();
// Array list of days.
var days = new Array('रविवार','सोमवार','मंगळवार','बुधवार','गुरुवार','शुक्रवार','शनिवार');
// Array list of months.
var months = new Array
('जानेवारी','फेब्रुवारी','मार्च','एप्रिल','मे','जून','जुलै','ऑगस्ट','सप्टेंबर','ऑक्टोबर','नोव्हेंबर','डिसेंबर');
// Calculate the number of the current day in the week.
var date = ((now.getDate()<10) ? "0" : "")+ now.getDate();
// Calculate four digit year.
function fourdigits(number) {
return (number < 1000) ? number + 1900 : number;
}
// Join it all together
today = days[now.getDay()] + ", " +
date +" " +
months[now.getMonth()] + ", " +
(fourdigits(now.getYear())) ;
// Print out the data.
document.write(today);
// End -->
</script>
<p><center>
<font face="arial, helvetica" size"-2">Free JavaScripts provided<br />
by <a href="http://javascriptsource.com">The JavaScript Source</a></font>
</center><p>
<!-- Script Size: 1.30 KB --></p></p>
<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
आज सकाळी कार्यालयात पोहोचलो आणि आशिषचा निरोप मिळाला. नेरेंद्र दाभोलकरांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. वृत्तवाहिन्यांची संकेतस्थळं पाहिली. सगळा भयानक प्रकार लक्षात आला.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
गेली कित्येक वर्षे दाभोलकरांचं काम पाहतो आहे. त्यांचे विचार आणि काम करण्याची शैली मला १००% पटलेली होती असं नाही. त्यांच्या काही गोष्टी मला आवडत नसत आणि त्याविषयी मी मित्रांशी अनेकदा बोललोही आहे. पण त्यांचं काम समाजाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही. अनेक वर्षे सातत्याने आपल्याला पटलेल्या विचारसरणीचा वैचारिक मार्गाने प्रचार-प्रसार करण्याचं काम दाभोलकर करत होते. अंधश्रद्धा, बुवाबाजी ह्यांच्या विरोधात त्यांनी सातत्याने वैचारिक झुंज दिली. मोठमोठ्या बुवांची बिंगं फोडली. वाणी आणि लेखणी ह्यांचा प्रभावी वापर केला. सनदशीर आणि अहिंसक मार्गाने चळवळी चालवल्या. अंधश्रद्धानिर्मूलनसमितीच्या माध्यमातून त्यांनी उभी केलेली वैचारिक चळवळ ही महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचीच आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
समितीचं काम करताना त्यांचा युक्तिवाद मला अनेकदा वकिली ढंगाचा वाटायचा. ती त्यांची शैली होती. आपल्याला हवा असलेला बदल समाजात घडावा ह्यासाठी त्यांनी स्वीकारलेला प्रचाराचा मार्ग होता. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
दाभोलकरांचे सगळे भाऊ आपापल्या पद्धतीने समाज कार्य करीतच आहेत. महाराष्ट्रातील समाजाच्या भल्याचा वसा घेतलेल्या कुटुंबांपैकी दाभोलकर बंधूंचा उल्लेख करावा लागेल. स्वतः नरेंद्र दाभोलकर हे उत्तम कबड्डीपटू असल्याचा उल्लेख त्यांच्या एका मुलाखतीत ऐकला होता. पण पुढचं आयुष्य अंधश्रद्धानिर्मूनाला त्यांनी वाहून घेतलं. गेली अनेक वर्षे 'साधना' ह्या साप्ताहिकाचे ते संपादक होते.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आज सकाळी पुण्यात जे घडलं ते कडकडीत निषेध करण्याच्या पलीकडलं आहे. भयानक क्लेशदायक आहे. ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तितका थोडा आहे. नुकतीच दाभोलकरांनी अंधश्रद्धानिर्मूलनसमितीच्या माध्यमातून जातपंचायतींच्या विरोधातली चळवळ सुरू केली होती. ह्या चळवळीला विरोध होणार हे उघडच होतं. पण महाराष्ट्रात असं काही घडेल ह्याची कल्पना नव्हती. जे घडलं ते अतिशय वाईट आणि निषेधार्ह आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शासनाने दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा लवकरात लवकर छडा लावला पाहिजे. त्यांच्या दुष्कृत्याचं माप त्यांच्या पदरात घालून संविधानसंमत शिक्षा त्यांना झालीच पाहिजे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-56001278349448520062012-06-30T02:46:00.002-07:002012-06-30T07:03:45.107-07:00काय तुम्ही येथे नसालसे जाले । आम्ही न देखिले पाहिजे हे !!!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
आज आषाढीचा दिवस. हा खरं तर महाराष्ट्रीय संतांच्या आणि विठूरायाच्या स्मरणाने साजरा व्हायला हवा आहे. पण आज त्याला एका लाजिरवाण्या परिस्थितीचा डाग लागलेला आहे असं मला वाटतं. पंढरपुरात मेहतर समाजाला आपल्याला मानवी मैला हाताने उचलावा लागू नये ह्यासाठी आंदोलन करण्याची पाळी आलेली आहे (<a href="http://www.ibnlokmat.tv/showstory.php?id=242382" target="_blank">पाहा</a>). २१व्या शतकाच्या, यंत्रयुगाच्या आणि जगाला समतेची शिकवण देणाऱ्या संतांच्या भागवतधर्माच्या फुशारक्या मारणाऱ्या महाराष्ट्राने आज लाजेने मान खाली घातली पाहिजे.</div>
<div style="text-align: justify;">
<br />
मैल्याचं व्यवस्थापन करणं भाग आहे आणि त्यासाठी कुणाला तरी ते करावं लागणार. पण आपल्याकडच्या जातिव्यवस्थेमुळे ही कामं विशिष्ट समाजालाच करावी लागतात. स्वातंत्र्यानंतरही ही स्थिती फारशी पालटलेली नाही. दुसरीकडे ह्या तऱ्हेची कामं करणाऱ्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही वाईट आहे. हे काम काही तरी हलक्या दर्जाचं आहे असं मानण्यात येतं. आपला मैला दुसऱ्यांनी स्वच्छ केलेला आपल्याला चालतो. पण दुसऱ्याचा मैला स्वच्छ करायची वेळ आपल्यावर आली तर ते अनेकांना स्वाभाविकरीत्या किळसवाणं वाटतं. रुग्णालयांत अतिसाराच्या रुग्णांसोबत असणाऱ्या नातेवाईकांचं निरीक्षण केलं तरी ही गोष्ट सहज लक्षात येईल. </div>
<div style="text-align: justify;">
<br />
ह्या तऱ्हेचं स्वच्छतेचं काम करणाऱ्या व्यक्तींना ते काम करण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध व्हायला हवी. ज्यात त्या व्यक्तीच आजारांना, अस्वच्छतेला बळी पडणार नाहीत ह्याची काळजी घ्यायला हवी. पण हे काम करणाऱ्या व्यक्तीही माणसंच आहेत ह्याची जाणीव आपल्या समाजात ठळकपणे दिसत नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br />
खरं तर <a href="http://indianchristians.in/news/images/resources/pdf/employment_of_manual_scavengers_and_construction_of_dry_latrines_prohibition_act_1993.pdf" target="_blank">१९९३ च्या अधिनियमा</a>द्वारे मानवी मैला हाताने उचलण्यास मनाई आहे. पण असं असूनही २०१२ ह्या वर्षात लोकांना आंदोलन करावं लागावं ही घटना लाञ्छनास्पद आहे. श्रीम. सोनिया गांधी ह्या ज्याच्या अध्यक्ष आहेत त्या राष्ट्रीय सल्लागार-समितीनेही ऑक्टोबर २०११ मध्ये ही प्रथा नाहीशी करण्यासंदर्भात केंद्र-शासनाला सूचना दिलेल्या आहेत (<a href="http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=110014:2010-10-23-16-19-36&Itemid=1" target="_blank">पाहा</a>). पण तरीही आपल्याला आज ह्या बातम्या वाचायला मिळाव्या हे दुर्दैवीच नव्हे तर संतापजनकही आहे. </div>
<div style="text-align: justify;">
<br />
पंढरपुरात प्रत्येक वर्षी आषाढीला यात्रा भरते आणि लक्षावधी वारकरी तिथे जमतात. अशा वेळी ह्याप्रकारचं व्यवस्थापन करावं लागणार हे उघड आहे. पण ह्या प्रश्नाचा नीट विचार करून एक नेहमीसाठीची व्यवस्था उभी राहायला हवी होती. पण हे काम मेहतर समाजातील लोकांचंच आहे असं जणू आपला समाज गृहीत धरून चालला आहे. जर असं असेल तर वेगळ्या वाटा शोधण्याचा प्रयत्नच होत नाही ह्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br />
ह्या संदर्भात मला अत्यंत धक्कादायक वाटलेली गोष्ट म्हणजे ह्या प्रश्नासंदर्भात वारकऱ्यांनी आणि त्यांच्या धुरिणांनी काहीच केल्याचं दिसत नाही. त्यांनी विचार करून मार्ग सुचवायला हवा होता. त्यासाठी स्वयंसेवकांच्या फळ्या उभ्या राहायला हव्या होत्या. त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करायला हवा होता आणि हे सगळं वारीच्या आधीच सुरू व्हायला हवं होतं. पण ह्या संदर्भात वारकऱ्यांकडून काही पावलं उचललेली असल्यास त्याची माहिती मला मिळालेली नाही. मला अशी माहिती मिळाली तर वारकऱ्यांविषयीचं माझं हे मत मी आनंदाने मागे घेईन.</div>
<div style="text-align: justify;">
<br />
पंढरीची वारी हे महाराष्ट्राचं एक श्रद्धास्थान आहे. पण ते श्रद्धास्थान वर्षानुवर्षं ह्या परिस्थितीचा विचार न करता राहतं ही गोष्ट मला तरी योग्य वाटत नाही. आधुनिक काळातील खरा संत असं ज्यांना म्हणता येईल त्या गाडगेमहाराजांची थोरवी अशा वेळी अधिकच जाणवते. ते स्वतः कधी पंढरपुरच्या मंदिरात गेले असतील किंवा नसतील पण त्यांनी यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांची सोय होईल ह्याची काळजी घेतली. मुंबईत जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक येतात. त्यांत रुग्णासोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या निवाऱ्याचा विचार केवळ गाडगेबाबांनाच केला. तिथे धर्मशाळा बांधली. ते सश्रद्ध होते. पण सजगही होते. हा सजगपणा वारकऱ्यांनी आणि पंढरपुरच्या विठ्ठलावर प्रेम करणाऱ्या इतरांनीही दाखवायला हवा.</div>
<div style="text-align: justify;">
<br />
गाडगेबाबा आपल्या कीर्तनात एक गोष्ट सांगायचे. एक पुरभय्या जेवणासाठी चौक सारवत होता. तो सारवताना त्याने डावा हात बाहेर धरला होता. त्याला कुणीसं विचारलं. "भय्याजी आपने वह बायाँ हाथ बाहर क्यों धरा है?" त्यावर तो पुरभय्या म्हणला "वह हात गंदा काम करता है. गंदगी धोता है." त्यावर त्या माणसानं विचारलं "गंदगी धोने वाला हाथ तो आपने बाहर धरा है लेकिन गंदगी का पिटारा जो पेट है, वह तो चौके में ही है. उसका क्या?" ह्या गोष्टीचा विचार आपल्या सगळ्या समाजाने करण्याची आवश्यकता आहे. </div>
<div style="text-align: justify;">
<br />
स्वच्छता, शुचिता ह्यांचे आपले निकष केवळ व्यक्तिगत राहतात. ते सामाजिकही झाले पाहिजेत आणि अधिक मानवसन्मुख झाले पाहिजेत. निदान पुढल्या वर्षीच्या वारीच्या वेळी आपल्याला असं काही ऐकायला मिळू नये ह्यासाठी प्रशासन, वारकरी आणि वारीविषयी आस्था असलेल्या अनेकांनी ह्या प्रश्नाचा पाठपुरावा येत्या वर्षभरात करण्याची आवश्यकता आहे. तुकोबांचे शब्द उसने घेऊन प्रशासन आणि वारकरी ह्यांना इतकंच सांगावंसं वाटतं की</div>
<div style="text-align: center;">
<br />
<span style="color: #ff6600;"><b>काय तुम्ही येथे नसालसे जाले । आम्ही न देखिले पाहिजे हे</b></span> </div>
<div style="text-align: center;">
<br /></div>
<div style="text-align: center;">
<br /></div>
</div>सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-59718502361672549242012-06-24T22:05:00.001-07:002012-06-24T22:06:21.232-07:00आग कधीच लागली...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="font-family: verdana,sans-serif;">आग कधीच लागली<br />धूर आतासा दिसला<br />नित्य धुमसणे काल<br />भाग थोडासा पेटला<br /><br />कशी विझवावी आग?<br />आणि कुणी विझवावी?<br />हीच चर्चा किती काळ<br />आता पुढे चालवावी?<br /><br />मूठभर राखेचे ह्या<br />आता पुरे कवतिक<br />
भवताली पसरला<br />आहे राखेचाच ढीग<br /><br />दाह जाणवेल असे<br />थोडे हवे जितेपण<br />नाही तर नेहमीचे<br />भले आपले सरण<br /><br />आग कधीची लागली<br />कुठे राख कुठे धूर<br />निववील ताप असा<br />मेघ अजूनही दूर</span><br />
<span style="font-family: verdana,sans-serif;"><span class="HOEnZb"><span style="color: #888888;"><br /></span></span></span></div>सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-37324465160775077762011-12-09T09:38:00.000-08:002011-12-09T10:06:11.878-08:00हुतात्मा चौक कहाँ है?<div style="text-align: justify;"><span style="font-size:100%;">आजचा दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. मी वासुदेव बळवंत फडके चौकातून हुतात्मा चौकात जाण्यासाठी टॅक्सी पाहात होतो. पहिली टॅक्सी थांबली. आत एक म्हातारबाबा चालक होते. मी विचारलं, "हुतात्मा <span>चौकात</span> सोडणार का?" त्या म्हातारबाबांनी कसनुसा चेहरा करून प्रतिप्रश्न केला "हुतात्मा चौक कहाँ है?".<br />माझ्या उत्तराची वाट न पाहता गाडी पुढे निघून गेली.<br />xxx<br />मग दुसरी टॅक्सी शोधू लागलो. ती दिसली. पुन्हा तोच प्रश्न.<br />"कहाँ है ये हुतात्मा चौक?" तोच अनपेक्षित प्रतिप्रश्न.<br />मला फारच आश्चर्य वाटलं होतं. मी गाडीतच शिरलो. म्हटलं, "मी दाखवतो हुतात्मा चौक कुठे आहे तो."<br />मग पुढचा संवाद. मी तापलोच होतो. तावातावाने मराठीतून बोलत होतो. त्याला न जुमानता हिंदीतून उत्तरं येत होती. स्वरात कुठेही आपलं काही चुकलंय असा भाव नव्हता.<br />मी म्हटलं, "तुम्ही मुंबईत इतके दिवस टॅक्सी चालवता तरी तुम्हाला हुतात्मा चौक माहीत नाही?"<br />"हो. नाही माहीत."<br />"तुम्हाला मुंबईतली ठिकाणं माहीत नाहीत तर तुम्हाला टॅक्सी-चालकाचा परवाना कसा मिळाला?"<br />"परवाना दलालांकरवी मिळतो"<br />टॅक्सीवाल्याला मंत्रालय माहीत होतं. तो रोज हुतात्मा चौकातूनच तिकडे जात होता. पण...<br />मी काय बोलणार?<br />निमूट हुतात्मा चौकात उतरलो. टॅक्सीवाल्याला हुतात्मा शब्दाचा अर्थ हिंदीत समजावून सांगितला. त्या ठिकाणाला हुतात्मा चौक असं का म्हणतात ते सांगितलं.<br />xxx<br />माझं काम आटोपून मी हुतात्मा चौकातून मंत्रालयात जाण्यासाठी टॅक्सीत बसलो. सहज टॅक्सीवाल्याला विचारलं. "हुतात्मा चौक कुठे आहे ते माहीत आहे का?"<br />"नाही."<br />xxx<br />संध्याकाळी सगळी कामं आटोपली. स्थानकाकडे निघालो होतो. शेजारी कुणा दोघांनी टॅक्सीला हात दाखवून टॅक्सी थांबवली. ते आपसात मराठीतून बोलत होते. त्यांनी टॅक्सीवाल्याला विचारलं. "फ्लोराफाउंटन?"<br />टॅक्सीवाल्याने होकार दिला असावा. त्याने ते उतारू टॅक्सीत बसवले होते.</span></div>सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-19830655285853211932011-07-14T00:53:00.000-07:002011-07-14T00:55:59.747-07:00१३ जुलै २०११ आणि नंतर...धडाड धुरळा उडतो गगनी<br />पुन्हा भय जनी दाटते गा<br />एकमेकां सारे सावरू धावती<br />निस्तरू पाहती पुन्हा तेच<br />सुटकेचा कोणी टाकती निःश्वास<br />कुणाचा प्रवास संपलेला<br />विव्हळत जागे कोणी वेदनांत<br />कुठे डोळियांत पाणी साचे<br /><br />चित्रवाणीवर वृत्त साकळते<br />जगाला कळते घडले ते<br />परिस्थिती कोणी सांगे विवरून<br />काय हो कारण घडे त्याचे<br />निषेधाचे कुणी पेटवी पलिते<br />शांत राखा माथे म्हणे कोणी<br />कुणी म्हणे धन्य धन्य नागरिक<br />शूर नि सोशिक धैर्यवंत<br /><br />उलटते रात येता येता नीज<br />पुन्हा नवा आज उजाडतो<br />भयशंका मनी दाटल्या घेऊन<br />चालती गा जन तीच वाट<br />कुजबुज कुठे संताप थोडासा<br />अगतिकचासा एक एक<br />पोट शिकविते धैर्य ते अटळ<br />अन्य काही बळ नाही तेथेसुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-84687932349804574872010-11-13T20:37:00.000-08:002010-11-14T20:51:13.901-08:00व्याकरणपरंपरेच्या सजग अभ्यासाची आवश्यकता<div style="text-align: justify;"><span style="font-size:100%;">दि. २४ ऑक्टोबरच्या दै. लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीत श्री. शुभानन गांगल ह्यांचा '<a href="http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=109714:2010-10-22-10-17-52&catid=195:2009-08-14-03-11-12&Itemid=206"><span>शोध</span> <span>मराठीचा</span> : <span>मूलभूत</span> <span>व्यंजन</span> <span>आणि</span> <span>मूलभूत</span> <span>स्वर</span>; <span>व्याख्यांची</span> <span>गरज</span></a>' ह्या शीर्षकाचा पानभर मजकुराचा मुलाखतवजा लेख छापण्यात आला आहे. ह्या मुलाखतवजा लेखात त्यांनी मराठी व्याकरण, ध्वनिविज्ञान, मोडी लिपी, देवनागरी, शुद्ध लेखन ह्यांविषयी काही मते मांडली आहेत. त्यांपैकी काहींचे परीक्षण ह्या लेखात करायचे आहे.<br /><br /><span style="font-weight: bold;">मूलभूत स्वर आणि मूलभूत व्यंजन ह्यांची लक्षणे (व्याख्या)</span><br /><br />श्री. गांगल ह्यांनी मूलभूत स्वर आणि मूलभूत व्यंजन ह्यांची लक्षणे (व्याख्या) देण्यासाठी 'जातीगुणवैशिष्ट्य' ह्या संकल्पनेचा आधार घेतला आहे. "जातीगुणवैशिष्ट्य म्हणजे ध्वनीतील 'फ्रिक्वेन्सी, लाऊडनेस, कालमापन' या गुणधर्मांपेक्षा वेगळा असा जाणता येणारा गुणधर्म" असे ह्या गुणधर्माचे लक्षण गांगल ह्यांनी केले आहे. ह्या विधानाने उपरोक्त गुणधर्म हा फ्रिक्वेन्सी इत्यादींहून वेगळा आहे हे कळते. पण तो नेमका कसा आहे, त्याचे मापन कसे करायचे हे कळत नाही. त्यामुळे शास्त्रीय दृष्टीने हे लक्षण निरुपयोगी आहे. अमुक उच्चारात एकच एक जातीगुणवैशिष्ट्य आहे की एकाहून अधिक जातीगुणवैशिष्ट्ये आहेत हे कसे ओळखायचे? भाषाविज्ञानात ध्वनीचे वर्णन उच्चाराचे स्थान (कंठ, तालु, मूर्धा इ.) आणि प्रयत्न (अल्पप्राण, महाप्राण, नाद, घोष इ.) ह्यांच्या आधारे करतात. त्यासाठी उच्चारणात होणाऱ्या मुखातील हालचालींचा आधार घेतात. जातीगुणवैशिष्ट्य ह्या वेगळ्या संकल्पनेचा वापर त्याच कामासाठी करायचा असेल तर ती संकल्पना पुरेशा स्पष्ट रीतीने मांडणे आवश्यक ठरते. तशी गांगलांनी मांडलेली नाही.<br />श्री. गांगल ह्यांनी आपल्या मूलभूत व्यंजनांच्या तक्त्यात 'ख्, घ्' इ. महाप्राण व्यंजने ही मूलभूत नसून ओघवती आहेत असे दाखवले आहे. हे पडताळून पाहायचे असेल तर क् ह्या व्यंजनात एकच जातीगुणवैशिष्ट्य आहे आणि ख् ह्या व्यंजनात एकाहून अधिक जातीगुणवैशिष्ट्ये आहेत हे कसे ठरते हेही सांगायला हवे. एकच एक असे म्हटल्याने जातीगुणवैशिष्ट्ये अनेक असतात हे उघड आहे. मग ती एकूण (किंवा ज्ञात असलेली) किती आहेत आणि क् आणि ग् हे त्यांच्यामुळे मूलभूत ठरत असतील तर त्यांपैकी क् ह्या व्यंजनातील जातीगुणवैशिष्ट्याचे स्वरूप हे ग् ह्या व्यंजनातील जातीगुणवैशिष्ट्याहून कसे वेगळे आहे हे दाखवण्याची आवश्यकता आहे. परंतु श्री. गांगल असे स्पष्ट न करता केवळ विधाने करतात. त्यामुळे ही त्यांनी दिलेली लक्षणे प्रत्यक्षात उपयोगी ठरत नाहीत.<br /><br /><span style="font-weight: bold;">प्रथम सांगण्याचा दावा</span><br /><br />मराठी व्याकरणात आपण बऱ्याच गोष्टी प्रथम सांगतो आहोत असा दावा गांगलांनी केला आहे. पण ते बरोबर नाही. मराठी लेखनातील इकारउकारांच्या ऱ्हस्व आणि दीर्घ अशा लेखनाविषयीची त्यांनी मांडलेली मते नवी नाहीत. मराठीतील ऱ्हस्वदीर्घ हे अर्थभेद करणारे नाहीत आणि कुठे ऱ्हस्व स्वर यावा आणि कुठे दीर्घ स्वर यावा हे सोबतच्या वर्णांच्या सापेक्षतेने त्या स्वराचे स्थान कोणते ह्यावरून ठरते. त्यामुळे इकारउकारांच्या ऱ्हस्वदीर्घभेदाकरता वेगळ्या चिन्हांची आवश्यकता नाही असे मत सदाशिव आठवले ह्यांनी (‘रसिक’ दिवाळी अंक, १९८३; ललित मासिक, एप्रिल १९८४ पृ. ६२;) पूर्वी मांडलेले आहे. ललित मासिकातील गमभन ह्या सदरात त्याविषयीचे आपले वेगळे मत पंतोजी ह्या टोपणनावाने कृ. श्री. अर्जुनवाडकर ह्यांनी नोंदवलेले आहे (ललित मासिक, फेब्रुवारी १९८४ पृ. ५१-५२; जून १९८४ पृ. ४२-४३). मराठी लेखननियमांवरील संस्कृताचा प्रभाव ह्या विषयावर डॉ. वि. भि. कोलते ह्यांनीही आपली परखड मते व्यक्त केली आहेत. इकारउकारासाठी एकच चिन्ह असावे अशी सूचना त्यांनीही १९६७ साली भोपाळ येथे भरलेल्या अ. भा. मराठी-साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात केली आहे. ह्या लोकांनी मांडलेली मते सर्वांना मान्य होतील असे नाही. पण त्यांनी ह्या दृष्टीने आधी विचार मांडलेले आहेत हे महत्त्वाचे.<br />मराठीचे व्याकरण हे मराठीला धरून लिहिले पाहिजे संस्कृत वा अन्य भाषांच्या साच्याला अनुसरून नव्हे हे मतही मराठी व्याकरणकारांनी आणि मराठी व्याकरणाच्या परीक्षणकारांनी अनेकदा मांडलेले आहे. ह्यात कृष्णशास्त्री चिपळूणकर, रा. भि. गुंजीकर, कृ. श्री. अर्जुनवाडकर, डॉ. अशोक केळकर अशा विद्वानांचा समावेश होतो. गांगल ह्यांपैकी कुणाचाही उल्लेख न करता मराठी व्याकरणाच्या परंपरेत आपणच काही तरी नवे मांडतो आहो हा जो आव आणतात तो आक्षेपार्ह आहे.<br />श्री. गांगल ह्यांनी लेखात दिलेला मूलभूत स्वरांचा तक्ता डॉ. ना. गो. कालेलकरांनी 'ध्वनिविचार' ह्या पुस्तकात (मौज प्रकाशन, आवृत्ती दुसरी, १९९०) पृ. २६वर पूर्वीच दिलेला आहे. भेद इतकाच आहे की ज्यासाठी श्री. गांगल हे 'मूलभूत' अशी संज्ञा वापरतात त्यासाठी डॉ. कालेलकरांनी 'शुद्ध' अशी संज्ञा वापरली आहे. त्यात व्यंजनांविषयीही सविस्तर विवेचन आलेले आहे. स्वरांचे आणि व्यंजनांचे असेच सविस्तर विवेचन डॉ. कालेलकर ह्यांनी मराठी विश्वकोशाच्या बाराव्या खंडातील 'मराठी भाषा' ह्या नोंदीतही (पृ. क्र. ११९७ ते १२०६) केले आहे. स्वरांचा उपरोक्त तक्ता (पृ. क्र. ११९८) आणि गांगलांपेक्षा व्यंजनांचे अधिक सविस्तर विवेचन करणारा तक्ता (पृ. क्र. ११९९) ह्या नोंदीत पाहायला मिळतो. तेव्हा आपले विवेचन अपूर्व आहे, हा काही तरी नवा शोध आहे हा गांगल ह्यांचा दावा सपशेल खोटा आहे.<br /><br /><span style="font-weight: bold;">मोडी लिपी आणि देवनागरी</span><br /><br />मोडी लिपी आणि देवनागरी ह्यांविषयीची गांगल ह्यांची विधाने ही अज्ञानमूलक आहेत. मोडी लिपीचा वापर मराठीने हजारो वर्षे केला असे ते म्हणतात. पण ह्याला काहीही आधार नाही. मराठीच्या उगमापासून मराठी ही केवळ मोडी लिपीत लिहिली जात असे अशी परिस्थिती दिसत नाही. जुने मराठी शिलालेख हे देवनागरीतच लिहिलेले आहेत. मोडीतला शिलालेख शिवकालातच दिसतो. गद्यासाठी मोडी आणि पद्यासाठी देवनागरीचा वापर होत असे हेही योग्य नाही. महानुभाव पंथाचे विपुल गद्यवाङ्मय उपलब्ध आहे आणि ते मोडी लिपीत लिहिलेले नाही. देवनागरीला बाळबोध असे म्हणत. ह्याचे कारण मोडीच्या तुलनेत ती शिकायला आत्मसात करायला सोपी वाटे असे दिसते. श्री. गांगल मात्र हजारो वर्षे मोडी वापरात होती असे सांगतात. तसे खरेच असेल तर आनंदच आहे. आताही गांगलांकडे ह्याचा काही सबळ पुरावा असेल तर तो त्यांनी जाहीर करावा. त्याचा वापर करून मराठीलाही तमिळेप्रमाणे अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करणे सोपे होईल.<br /><br /><span style="font-weight: bold;">संस्कृत आणि मराठी</span><br /><br />संस्कृतात धातू असतात आणि मराठीत ते नसतात हे विधान हास्यास्पद आहे. मुळात धातू, प्रातिपदिक, प्रत्यय इ. संकल्पना ह्या भाषाविशिष्ट नसून विश्लेषणासाठी वापरण्यात येणाऱ्या अर्कभूत (अमूर्त) संकल्पना आहेत. भाषिक सामग्रीचे समान रूप आणि समान अर्थ ह्या दृष्टीने विश्लेषण केले तर जे अवयव मिळतात त्यांपैकी एका प्रकाराला धातू हे नाव दिलेले आहे. उदा. करणे, करतो, करणारा आणि बसणे, बसतो, बसणारा ह्या शब्दांत कर-णे, कर-तो, कर-णारा, बस-णे, बस-तो बस-णारा अशी फोड करता येते. ह्यांपैकी कर आणि बस ह्यांना धातू असे म्हणतात. आख्याताचे म्हणजे काळ आणि अर्थ ह्यांचे प्रत्यय अशा शब्दांना लागतात. दादोबांपासून दामल्यांपर्यंतच्या अनेक मराठी व्याकरणकारांनी आपल्या व्याकरणांत धातू ही संकल्पना वापरलेली आहे. तशी ती वापरणे कसे चुकीचे आहे हे श्री. गांगल ह्यांनी साधार सिद्ध केलेले नाही. अशी फोड मराठीप्रमाणेच इतर भाषांतील शब्दांचीही करता येते आणि ह्या अर्थी त्या भाषांतही धातू आहेत असे मानता येते. ध्वनींचे अणुरेणू शोधून काढण्याची भाषा करणाऱ्या गांगलांना ही फोड कळायला हरकत नव्हती. जर धातू ही संकल्पनाच नाकारायची असेल तर विश्लेषणाची वेगळी पद्धती विकसित करून ती नाकारता येईल. पण मग त्या मांडणीनुसार संस्कृतातही धातू नसतील आणि मराठीतही नसतील. त्यामुळे संस्कृतात धातू असतात आणि मराठीत नसतात हे श्री. गांगल ह्यांचे विधान निराधार आहे.<br /><br /><span style="font-weight: bold;">भाषाग्रहण आणि भाषाशिक्षण</span><br /><br />संस्कृतात धातूंपासून पद घडवण्यात येते आणि मराठी मात्र शब्द स्वीकारते. संस्कृतात पद घडवण्यासाठी घोकंपट्टी लागते हे त्यांचे विधान म्हणजे तर व्याकरण आणि भाषा ह्यांविषयीच्या अज्ञानाचा कळस आहे. भाषेतील पदाची घडण कशी असते ह्याचा अभ्यास आणि भाषेत पदे कशी बनतात हे शिकणे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भाषाशिक्षण आणि भाषाग्रहण ह्यातील भेद त्यांना उमगलेला नाही. आता आपल्याकडे संस्कृत शिकणारे ती भाषा मातृभाषा म्हणून ग्रहण करत नाहीत तर दुसरी भाषा म्हणून शिकतात म्हणून घोकंपट्टी लागते. उलट मराठी ही भाषा लहान मुले आपल्या अवतीभोवतीच्या संस्कारातून ग्रहण करतात (शिकत नाहीत). जर एखादी व्यक्ती संस्कृत ही भाषा मराठीप्रमाणेच स्वाभाविकपणे ग्रहण करत असेल तर तिलाही घोकावे लागणार नाही. पण व्याकरणिक विश्लेषणाच्या विशिष्ट दृष्टीने भाषेतील पद घडण्याची प्रक्रिया दोन्हीकडे एकाच तऱ्हेची असते (भाषेचे वर्णन हे व्याकरणाचे मुख्य उद्दिष्ट असते. भाषा शिकणे-शिकवणे हा आनुषंगिक उपयोग आहे.). उदा. पाणिनीय व्याकरणानुसार संस्कृतातील करोति हे क्रियापद कृ ह्या धातूला उ हे विकरण आणि तिप् (ति) हा तिङ् ह्या गटातला प्रत्यय लागून बनले आहे. मोरो केशव दामले ह्यांच्या व्याकरणानुसार मराठीतही करतो हे क्रियापद कर् ह्या धातूला तो हा प्रथमताख्याताचा (पाहा : शास्त्रीय मराठी व्याकरण - मोरो केशव दामले) प्रत्यय लागून बनले आहे. व्याकरणाच्या विशिष्ट दृष्टीने मराठीतही अवयवांपासूनच पद घडते आहे.<br /><br /><span style="font-weight: bold;">व्याकरण की शुद्ध लेखन</span><br /><br />सबंध लेखात गांगल व्याकरणाविषयी सुरवात करतात आणि शुद्ध लेखन ह्या विषयावर घसरतात. मुळात व्याकरण आणि शुद्ध लेखन ह्या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत आणि दोन्ही स्वतंत्रपणे भाषेशी संबंधित आहेत हे लक्षात घ्यायला हवे.<br />व्याकरण हे मुख्यत्वे बोलण्याशी संबंधित असते. त्यात येणारी वर्गीकरणे बोलण्यावरून केलेली असायला हवीत लेखनावरून केलेली नव्हेत. मराठीच्या बऱ्याच व्याकरणांत हा दोष कसा आढळतो हे अर्जुनवाडकर, अशोक केळकर ह्यांसारख्या अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. एऱ्हवी मराठी व्याकरणकारांना दोष देणारे श्री. गांगल हे शिरीन, विमल अशी नावे लिहून ती मराठीत अकारान्तात गणतात असे दिसते. कारण ती नामे ते संस्कृतात अ-कारान्त असल्याने स्त्रीलिंगी ठरत नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. पण ही नामे मराठीत व्यंजनान्त उच्चारण्यात येतात. त्यामुळे ती व्यंजनान्त आहेत असे म्हटले पाहिजे. लेखनात अशा व्यंजनान्त नामांचे लेखन पायमोडीचे (्) चिन्ह लावून करत नाहीत (गांगलांना प्रिय असलेल्या मोडी लिपीत तर ह्या चिन्हाचा वापर जुन्या काळी होतच नसे) पण ह्यामुळे ती नामे व्याकरणदृष्ट्या अकारान्त ठरणार नाहीत. अशा अनेक चुका गांगल ह्यांच्या लेखात आढळतात.<br /><br /><span style="font-weight: bold;">शाळा आणि शास्त्र</span><br /><br />मराठी व्याकरण म्हणजे केवळ श्री. मो. रा. वाळंबे ह्यांचे पुस्तक अशी गांगल ह्यांची समजूत असावी असे त्यांचे लेखन वाचून वाटते. कारण मराठी व्याकरणाच्या परंपरेत विविध विषयांवर जी कडोविकडीची चर्चा झाली आहे, वाद झडले आहेत त्याचा मागमूसही गांगल ह्यांच्या लेखनात दिसत नाही. त्यांचा मराठीच्या व्याकरणपरंपरेशी पुरेसा परिचय नसावा असे वाटते. ही परंपरा त्यांनी नीट समजून घेतली तर संस्कृत आणि इंग्रजी व्याकरणाच्या प्रभावातून बाहेर पडण्याचे प्रयत्न ह्या परंपरेत झाले आहेत, होत आहेत हे त्यांच्या लक्षात येईल. एखादा विषय शालेय पाठ्यपुस्तकांत नीट मांडलेला नाही म्हणून त्या विषयावर शिस्तीने काम झालेलेच नाही असे मानण्याचे कारण नाही.<br />गांगलांचा लेख वाचल्यावर लक्षात येते की गांगलांची मराठीच्या लेखनाबाबत काही मते आहेत आणि ती रूढ व्हावीत असा त्यांचा प्रयत्न आहे. ह्यात चुकीचे काहीच नाही. पण ही मते ते साधार आणि तर्कशुद्ध रीतीने थेट मांडतील तर अधिक बरे होईल. त्यासाठी व्याकरण, ध्वनिविज्ञान, लिपी, भाषेचा इतिहास ह्यांना उगाचच वेठीला धरण्याचे कारण नाही. ह्या गोष्टींचा त्यांचा पुरेसा अभ्यास आहे असे दिसत नाही. तो नसेल तेव्हा अभ्यासाच्या मर्यादेत जपून विधाने करण्याची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती. पण ते प्रमाणे न देता विधाने करत जातात. त्यात अनेक विषयांची असंबद्ध भेळ करतात. ह्यामुळे त्यांचे लेखन दुर्बोध आणि तर्कदुष्ट होते. त्यांनी आपली मते तपासून ती अभ्यासपूर्वक, सप्रमाण मांडावीत असे सुचवावेसे वाटते.<br /><br /></span></div>सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-28296096108468116122010-04-17T09:08:00.000-07:002010-04-18T20:02:08.616-07:00स्वातंत्र्यदेवीची समजावणी<div style="text-align: justify;"><span style="font-size:85%;">(दि. १० नोव्हेंबर १९९६च्या दैनिक सकाळच्या दिवाळी-पुरवणीत कविवर्य कुसुमाग्रजांची 'स्वातंत्र्यदेवीची विनवणी' ही कविता प्रसिद्ध झाली होती. म्हणजे सुमारे १४ वर्षांपूर्वी. एव्हाना लोकांना काय सांगण्याची आवश्यकता आहे हे स्वातंत्र्यदेवीला उमगलं असेल. आता ती लोकांना काय समजावेल हे सांगणारी ही कविता. अर्थात कविवर्य कुसुमाग्रज आणि शाहीर अनंतफंदी ह्यांची क्षमा मागूनच)<br /></span></div><br /><div style="text-align: center;"><span>कसली</span> नीती, न्यायहि कसला कसली आशा धरू नका<br />मीच सांगते जगायचे तर भलेपणाला भजू नका<br /><br />काहि ठकांनी स्वातंत्र्याच्या स्वप्नांनी ठकविले तुम्हा<br />तेच खरे मानून आणखी भ्रमात भलत्या जगू नका<br /><br />भ्रष्टाचारच एकमेव ह्या जगण्याचा आधार असे<br />भ्रष्ट व्हायचे नसेल तर मग जिवंत येथे राहु नका<br /><br />सदा लाच द्या, घ्या जमली तर हाच खरा व्यवहार असे<br />देणेघेणे जमे न ज्यांना तया जगाया देउ नका<br /><br />जनसेवेस्तव नसे कचेरी ती डाकूंची असे गुहा<br />मेजावरतुन मेजाखालुन लुटल्यावाचुन राहु नका<br /><br />वेतन खाउन कामे करणे लक्षण हे तर मूर्खाचे<br />करोत दुसरे, बघोत तिसरे उगा लाज बाळगू नका<br /><br />विचार जाळा थोरांचे अन् पुतळे त्यांवर थोर रचा<br />जातींमध्ये तया विभागा कार्य तयांचे स्मरू नका<br /><br />समतेचा जप करा मुखाने उतरंडी पण मनी जपा<br />इतरांना उपदेश करा अन् स्वतः तसे पण वागु नका<br /><br />'तगेल जो, तो जगेल' येथे हाच एक हो न्याय खरा<br />असाल दुबळे तर मग येथे स्वप्न जिण्याचे पाहु नका<br /><br />असेल हिंमत नरड्यावरती पाय देउनी जगा इथे<br />नसेल तर मग शेपुट घालुन उगाच वाया भुंकु नका<br /><br />गिऱ्हाईक व्हा नित्य कशाला विकावयाची आस उगा<br />परावलंबी राहा सदाचे नवी निर्मिती करू नका<br /><br />परभाषेतच व्हा पारंगत द्रव्यसाधना करा खरी<br />माय मराठी सुखे मरू द्या परकीचे पद सोडु नका<br /><br />भाषा कसली, देशहि कसला कुणी कुणाचे नसे इथे<br />निष्ठा, प्रीती, भक्ती असल्या मायाजाळी गुंतु नका<br /><br />'असेच असते', 'हेच चालते' हा जगण्याचा मंत्र स्मरा<br />उगा जगाला बदलायास्तव प्राणपणाने झटू नका<br /><br />'जन्मा आला निश्चित मरतो' हेच सुखाचे वाटुन घ्या<br />जन्मा आणि मरा कधीही 'करा' असे पण म्हणू नका<br /><br />'शब्द बापुडे केवळ वारा' अर्थ फुकाचा शोधु नका<br />असल्या कविता वाचा, विसरा विचार त्यावर करू नका<br /></div>सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-62508918765131439112009-12-18T01:39:00.000-08:002009-12-18T01:49:23.139-08:00नव्या मराठी ओव्याआज खूप दिवसांनी अचानक ह्या ओव्या स्फुरल्या. आता घरोघर अशा नव्या ओव्या घुमू लागायला हव्यात.<br /><br /><div style="text-align: center;"><span style="font-size:130%;"><b>नव्या मराठी ओव्या</b><br /><br />जात्यावरल्या ओवीत<br />माझ्या मराठीची साद<br />होती घुमत एकदा<br />इथे भिजल्या स्वरांत<br /><br />तेव्हापासूनच तिचा<br />जडे यंत्रासवे संग<br />तिच्या करणीने धावे<br />साहाय्याला पांडुरंग<br /><br />दिस जात्याचे सरले<br />आला संगणक हाती<br />तिच्या निरोपाच्या खुणा<br />महाजालही व्यापती<br /><br />युनिकोडाचा संकेत<br />तिचे नवे सिंहासन<br />तिने झुगारले आता<br />स्थलकालाचे बंधन<br /><br />आता जग सारे आहे<br />तिच्यासाठी भीमातीर<br />नव्या ज्ञानाच्या गजरी<br />दुमदुमे दिगंतर<br /><br />तिच्या विजयाचे खांब<br />आता रोवा गावोगाव<br />घरोघरी जन्मू देत<br />नवे तंत्रज्ञानदेव</span><br /></div>सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-76753670511494143962009-09-03T10:58:00.000-07:002009-09-03T11:28:45.027-07:00शींव ते सायन : प्रवासाच्या निमित्ताने<div><span class="Apple-style-span" style="font-size:large;">मुंबईतल्या एका विभागाचं नाव शीव असं आहे. रेल्वेस्थानकावर, शासकीय व्यवहारात हेच नाव रूढ असलेलं दिसतं. मात्र लोकांच्या व्यवहारात (नि त्यामुळे काही वेळा प्रशासकीय व्यवहारातही) सायन असं नाव रूढ आहे. हा नावाचा शीव ते सायन हा प्रवास कसा झाला हे पाहणं गंमतीचं आहे. आपण रेल्वेस्थानकावरच्या ह्या नावाच्या पाट्या पाहिल्या तरी आपल्याला ह्या नामान्तराचा सहज बोध होऊ शकेल. पाटीवर देवनागरी लिपीत हे नाव शीव असं तर रोमी लिपीत SION असं लिहिलेलं आढळतं. त्यावरून सायन ह्या नावाचा उगम ह्या रोमी अक्षरवाटिकेत आहे हे उघड आहे. पण शीव ह्या नावाचं लेखन रोमी लिपीत सायन असं का व्हावं? </span></div><div><span class="Apple-style-span" style="font-size:large;">पूर्वी शीवऐवजी हे नाव शींव असं शिरोबिंदुयुक्त लिहिलं जात असे. माडगावकरांच्या ‘मुंबईचे वर्णन’ ह्या पुस्तकात असंच लेखन आढळतं. त्याचा उच्चारही सानुनासिक होत असावा. ‘SION’ हे रोमी लेखन खरं तर ह्याच लेखनाला वा उच्चाराला अनुसरणारं आहे. कसं ते पाहू. ‘श’साठी ‘S’ हे अक्षर आलं. ‘S’ ह्या अक्षराचा उच्चार अनेक ठिकाणी श असाच अभिप्रेत असतो. उदा. Sewari म्हणजे शिवडी (S = श). इकारासाठी I वापरलेला आहे. स्वराचा अनुनासिक उच्चार नि पुढे व येत असेल (शींव ह्यात ई हा सानुनासिक आहे नि त्यापुढे व येतो. श्-ई-ं-व्.) तर ‘व’साठी रोमी लेखनात O वापरून आधी येणाऱ्या अनुनासिकाच्या उच्चाराचं चिन्ह म्हणून येणारं N हे अक्षर O ह्या अक्षरानंतर लिहिण्याची प्रथा आहे. तुळा : गांव = GAON.</span></div><div><span class="Apple-style-span" style="font-size:large;">म्हणजे देशी भाषांतल्या उच्चारांचं वा लेखनाचं रोमीकरण करण्याच्या जुन्या संकेताप्रमाणे SION ह्याचं वाचन शींव असंच व्हायला हवं. पण हा संकेत ठाऊक नसलेल्या कुणी तरी SION ह्याचं वाचन LION ह्या वाचनाला अनुसरून सायन असं केलं असावं नि सध्या तेच रूढ होतं आहे.</span></div><div><span class="Apple-style-span" style="font-size:large;">शींव ते सायन हा प्रवास इथं संपत नाही. तो अनेक वेगवेगळे प्रश्न मनात उभे करतो आणि त्यांचा धांडोळा घेणं भाग पडतं. शीव हे नाव देवनागरीत वाचता येणारे असंख्य लोक त्या नावाचा उच्चार सायन असा रोमी लेखनाला अनुसरून का करतात? कारण उघड आहे. देशाला स्वातंत्र्य लाभून पन्नास वर्ष उलटली असली तरी इंग्रजी भाषेचा आणि रोमी लिपीचा दरारा अद्यापही लोकांच्या मनातून पुसला गेलेला नाही. देशी भाषांची आणि लिप्यांची उपेक्षाही संपलेली नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढतेच आहे. देशी भाषांतला ज्ञानव्यवहार दिवसेंदिवस उणावतो आहे. जो आहे तो केवळ इंग्रजीवर आधारलेला नि तेवढ्याच अर्थाने परभृत स्वरूपाचा आहे. त्यामुळे जे इंग्रजीतलं नि रोमीतलं तेच फारशी चिकित्सा न होता प्रमाण मानलं जातं. अनेकांना ह्या प्रकारात काही चूक आहे हेच उमगत नाही. स्वभाषेविषयी त्यांच्या भावना बोथटलेल्या आहेत. ते परभाषेलाच आपली भाषा मानत आहेत. तीच त्यांच्या स्वाभाविक अभिव्यक्तीची भाषा होऊ पाहात आहे. ह्यातून आपला मानसिक परधार्जिणेपणा आणि बौद्धिक आळसही दिसून येतो. ह्या आळसाची काही आणखी उदाहरणं लेखनाच्या संदर्भातच पाहता येतात.</span></div><div><span class="Apple-style-span" style="font-size:large;">कल्याण ह्या रेल्वेस्थानकाचं नाव देवनागरी ह्याच लिपीचे भेद वापरणाऱ्या हिंदी नि मराठीत वेगवेगळं होतं. एऱ्हवी कुणीही हिंदी भाषक ‘मेरा कल्यान करो’ असं लिहिणार नाही. पण स्थानकाचं नाव मात्र ‘कल्याण’ असं न लिहिता ‘कल्यान’ असंच लिहितात. स्थानिक उच्चाराचं योग्य देवनागरी लेखन उपलब्ध असताही कल्यानच का? तर ते रोमीवरून लिप्यन्तरायचं म्हणून.</span></div><div><span class="Apple-style-span" style="font-size:large;">दुसरं उदाहरण आपलं म्हणजे मराठी माणसांचं घेऊ. ओडिसा ह्या राज्याचं नाव आपण तरी ओरिसा असं का लिहितो. त्याच्या रोमी लेखनात R हे अक्षर आहे म्हणूनच ना? नृत्याचं नाव मात्र आपण ओरिसी असं न लिहिता ओडिसी असंच लिहितो. रोमी लेखनाचं अनुसरण. दुसरं काय? आपल्या शेजाऱ्याची ओळख आपल्याला परकीयांच्या मध्यस्थीवाचून करून घेता येत नाही. आणि ही परकीयांनी करून दिलेली ओळख बरोबर आहे की नाही ह्याची त्या शेजाऱ्याला विचारून निश्चिती करावी असंही आपल्याला वाटत नाही. हा ‘रोमी वाक्यं प्रमाणम्’चा प्रकार आपला बौद्धिक आळस नि अंध भक्तीच दाखवत नाही काय? आपापल्या लिप्यांत आपल्या देशातली स्थलनामं अचूक लिहावीत असं आपल्याला वाटतच नाही.</span></div><div><span class="Apple-style-span" style="font-size:large;">पानी, लोनी हे उच्चार ज्या शिक्षितांना खटकतात त्यांना वांद्र्याला बॅण्ड्रा म्हटलेलं खटकत नाही. बंगळूरु, मंगळूरु म्हणायला त्यांची जीभ अडखळते. बॅङ्गलोर त्यांना प्रतिष्ठेचं वाटतं. वस्तुतः ह्या नावांमधल्या ऊर ह्या भागाचं लेखन रोमीत ORE असं होत असे. </span></div><div><span class="Apple-style-span" style="font-size:large;">उदा. </span></div><div><span class="Apple-style-span" style="font-size:large;">Banglore</span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size:large;"> </span></span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size:large;"> </span></span><span class="Apple-style-span" style="font-size:large;">बंगरूळ</span></div><div><span class="Apple-style-span" style="font-size:large;">Vellore</span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size:large;"> </span></span><span class="Apple-style-span" style="font-size:large;">वेलूर</span></div><div><span class="Apple-style-span" style="font-size:large;">Mysore</span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size:large;"> </span></span><span class="Apple-style-span" style="font-size:large;">मैसूर</span></div><div><span class="Apple-style-span" style="font-size:large;">Tagore</span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size:large;"> </span></span><span class="Apple-style-span" style="font-size:large;">ठाकूर</span></div><div><span class="Apple-style-span" style="font-size:large;">आपण ते ऊर असंच वाचलं पाहिजे (दक्षिणी नावांसंदर्भात उरु असं सुधारूनही घेतलं पाहिजे) हा विवेक आपल्याकडे उरलेला नाही. कारण अशा विवेकासाठी स्वतंत्र बुद्धी लागेल. आपल्याकडे तिची बहुतांश ठिकाणी वानवा आहे. साहेब बोबडं बोलतो म्हणून आपणही बोबडंच बोललं पाहिजे ही भावना आपल्या मनातून गेलेली नाही.</span></div><div><span class="Apple-style-span" style="font-size:large;">मराठीच्या देवनागरी लेखनसंकेतानुसार (हिंदीचा देवनागरी लेखनसंकेत मराठीहून अनेक ठिकाणी वेगळा आहे ह्याची आठवण ठेवली पाहिजे.) स्थल, व्यक्ती इत्यादींची नावं कशी लिहावीत हा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. डॉ. अशोक केळकर ह्यांच्या वैखरी ह्या ग्रंथात भारतीय स्थलनामांचं लेखन कसं करावं ह्याविषयी एक लेख आहे. पण हा अपवाद वगळता (इतकी वर्षं जगाला शहाणं करणाऱ्या इंग्लिशेत शिकूनही) आपल्याला असं काही करावंसं वाटलेलं नाही. निदान भारतापुरता तरी हा प्रयत्न करून पाहायला हवा. त्यात अडचणी नसतील असं नाही. पण स्वतंत्र बुद्धीने काही तरी केल्याचा आनंद त्यात नक्कीच असेल.</span></div><div><span class="Apple-style-span" style="font-size:large;"><br /></span></div><div><span class="Apple-style-span" style="font-size:large;"><br /></span></div><div><br /></div>सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-9999974006480528802009-06-19T21:43:00.000-07:002009-06-19T22:38:55.652-07:00मराठीत हे नीट सांगता येतं<span class="Apple-style-span" style="font-size: medium;">प्रसारमाध्यमांतलं मराठी ऐकताना वाचताना अनेकदा आपल्याला त्रास होतो. ते हिंदी वा इंग्रजी वळणाचं मराठी ऐकताना वाचताना आपण चडफडतो. पण नुसतं चडफडण्याने काही साधणार नाही. आपल्याला त्या अ-मराठी वळणाच्या प्रयोगांच्या जागी मराठी वळणाचे प्रयोग कोणते आहेत हे सुचवावं लागेल. ज्यांना व्यवस्थित मराठी बोलावंसं वाटतं त्यांच्यासाठी सहाय्य म्हणून खाली अशा प्रयोगांची सूची करून देत आहे. </span><div><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">अनेकदा अमुक शब्द मराठी नाही असं कळत असतं पण त्याला चपखल मराठी शब्द सुचत नाही. अशा वेळी ही सूची पाहता येईल.</span></div><div style="text-align: center;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"><br /></span></div><div style="text-align: center;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">शब्द</span></div><div style="text-align: center;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"><br /></span></div><div><ul><li><b><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">चहलपहल</span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span></span></span></span></b><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">: </span><span class="Apple-style-span" style="color:#3366FF;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">वर्दळ </span></span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="color:#3366FF;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span></span></span><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">सकाळी ह्या ठिकाणी बऱ्यापैकी </span><span class="Apple-style-span" style="color:#FF0000;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">चहलपहल </span></span><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">असते</span></li><li><b><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">गळ (णे</span></b><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">)</span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span></span></span></span></span><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">: </span><span class="Apple-style-span" style="color:#3333FF;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">विरघळ </span></span><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">(णे) </span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span></span><span class="Apple-style-span" style="color:#FF0000;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">गळेल </span></span><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">की टिकेल</span></li><li><b><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">दर्शक </span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span></span></span></span></span></b><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">: </span><span class="Apple-style-span" style="color:#3333FF;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">प्रेक्षक </span></span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="color:#3333FF;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span></span></span><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">मलिकेला </span><span class="Apple-style-span" style="color:#FF0000;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">दर्शकांचा </span></span><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">पाठिंबा मिळतो आहे. (मराठीत दर्शक म्हणजे दाखवणारा.</span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span></span><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">उदा. </span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span></span></span><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">मार्गदर्शक/दर्शक विशेषण)</span></li><li><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"><br /></span></li></ul><div><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"><br /></span></div><div><div style="text-align: center; "><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"><br /></span></div><div style="text-align: center; "><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">वाक्य/वाक्यांश/वाक्प्रचार</span></div><div style="text-align: center; "><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"><br /></span></div><div style="text-align: center; "><ul><li style="text-align: left;"><span class="Apple-style-span" style="color:#FF0000;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">माझी </span></span><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">मदत कर</span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span></span><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">: </span><span class="Apple-style-span" style="color:#FF0000;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">मला </span></span><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">मदत कर</span></li><li style="text-align: left;"><span class="Apple-style-span" style="color:#FF0000;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">काट्याची टक्कर</span></span><span class="Apple-tab-span" style="white-space:pre"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"> </span></span><span class="Apple-style-span" style="color:#FF0000;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;">: अटीतटीचा सामना</span></span></li><li style="text-align: left;"><span class="Apple-style-span" style="color:#FF0000;"><span class="Apple-style-span" style="font-size: medium;"><br /></span></span></li></ul></div><div><div style="text-align: left;"><br /></div></div></div></div>सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-55494740690857031602009-04-10T09:21:00.000-07:002009-09-03T11:31:37.952-07:00गौरी खरंच शिकू लागली आहे....<div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">आज आमच्या वहिनींनी एक छान बातमी सांगितली. माझी पुतणी गौरी ही यंदा १०वीच्या वर्षाला बसणार आहे. ती मराठी माध्यमाच्या शाळेत शिकते. मात्र आठवीत तिने निम-इंग्रजी (सेमी-इंग्लिश) वर्गाच्या तुकडीत प्रवेश घेतला होता. ह्या तुकडीला इंग्रजीतून विज्ञान आणि गणित हे विषय शिकवतात. कारण मराठी माध्यमातली मुलं ११वीत गेल्यावर तिथे शिक्षणाचं माध्यम इंग्रजी हेच असतं. तिथे मराठी मुलं मागे पडतील अशी भीती काही पालकांना आणि काही शिक्षकांना (!) वाटते. ही भीती ते मुलांच्याही मनात घालतात. त्यावर हा उपाय शोधलेला आहे.<br /></span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">मला आठवतं आहे की गौरीनेही ह्या तुकडीत प्रवेश घेतला आहे हे वहिनींनी मला सांगितलं होतं. माझी मतं ह्यासंदर्भात किती कडवी आहेत हे त्यांना माहीत होतं. मी त्यांच्यापाशी "हा सर्व मूर्खपणा आहे" असं म्हणाल्याचंही मला आठवतंय. पण मी नंतर गौरीशी किंवा वहिनींशी ह्या विषयावर काहीच बोललो नव्हतो.<br /></span></div><div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">मुळात देशीभाषकांच्या इंग्रजीकरणाचा हा एक टप्पा आहे.त्यात देशी भाषांना उघड विरोध नाही. पण गणित आणि विज्ञान हे 'प्रागतिक' विषय आहेत ना! त्यांना प्रागतिक भाषेची जोड हवी. म्हणून ते इंग्रजीत शिकवायचे. अशा मुलांच्या वेगळ्या तुकड्या काढायच्या. त्या मुलांत आणि समाजात खोट्या समजुती पसरवायच्या असा हा डाव आहे. आणि हा डाव आपल्याच देशातले इंडियायी लोक खेळत आहेत. परके नव्हेत. बरं हेच दोन विषय का? इतिहास पुढे इंग्रजीत शिकावा लागला तर तो कठीण होत नाही? का इतिहासाचं इंग्रजी सोपं असतं? खरं असं आहे की सर्वच शिक्षण इंग्रजीतून द्या असं ज्यांना म्हणता येत नाही त्यांच्यासाठी हा मधला सापळा लावलेला आहे. एऱ्हवी सेमी-इंग्रजी घेतलेले सगळेच त्याविषयांत झेंडा फडकवणार आहेत आणि मराठीतून शिकणारांना तो फडकवताच येणार नाही असं थोडंच आहे? असो.<br /></span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">आज वहिनींनी मला सांगितलं की गौरीने पुन्हा पूर्ण मराठी माध्यमाच्या तुकडीत प्रवेश घेतला आहे. झालं असं की ह्या निम-इंग्रजी वर्गात गेल्यावर तिच्या असं लक्षात आलं की तिचा बहुतेक वेळ मजकूर समजून घेण्यातच चालला आहे. विषयाची जाण कमी होते आहे. गौरी ही मुळात खेळाडू आहे. ती टेनिसपटू आहे. त्या खेळात तिला विलक्षण रस आहे. तिने आपला काही वेळ ह्या खेळासाठी देणं फारच आवश्यक आहे. पण ह्या तुकडीत गेल्यावर गुणांची टक्केवारी घसरली. आणि तिचं तिलाच हे कळू लागलं. शेवटी तिने आईला सांगितलं. आणि शाळेत सांगून आपली तुकडी बदलून घेतली.<br /></span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">पण हे सगळं इतकं सहज घडलं नाही. काही शिक्षकांना हा प्रकार विलक्षण चुकीचा वाटला. त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तू हुशार मुलगी आहेस. उगाच असं का करतेस? पुढे सर्वच विषय इंग्रजीतून शिकायचे आहेत. तेव्हा काय करशील? इ.<br /></span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">ह्या प्रकरणात मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे गौरी आपल्या निर्णयावर ठाम होती. तिचं म्हणणं असं होत की पुढे काय करायचं ते मी पाहून घेईन. पण आता माझा बराच वेळ इंग्रजी समजण्यात जातो. विषय कळतच नाही. घोकंपट्टी होते. त्यापेक्षा मराठीतूनच शिकणं बरं आहे.<br /></span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">ही गोष्ट कळल्यावर मला खूप आनंद झाला. केवळ इंग्रजी टळल्याचा हा आनंद नव्हता. तो आहेच. पण आपल्याला आपला निर्णय घेता आला पाहिजे. तो घेण्याची क्षमता ज्यातून येते ते शिक्षण. एवढ्या विरोधात, जग हेटाळणी करेल हे कळत असून आपल्या वेगळ्या निर्णयावर ठाम राहणं ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. नकळत का होईना पण गौरी खरंच शिकू लागली आहे.<br /></span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">हे सेमी-इंग्रजीचं खूळ कुणी काढलं ते माहीत नाही. ही एक नवी जातिव्यवस्था आहे. आणि गंमत म्हणजे तोंडाने सतत समतेचा घोष करणारेच एकतर त्याच्या बाजूने आहेत किंवा त्याला मूक संमती देत आहेत. खरं तर आपल्या देशात अदृश्यपणे २ राष्ट्रं वावरत आहेत. एक आहे इंडिया आणि दुसरा आहे भारत. इंडियाची एकमेव भाषा इंग्रजी आहे तर भारतात बऱ्याच भाषा आहेत. इंडियाचं धोरण तोंडाने विविधतेचा जप करायचा आणि प्रत्यक्षात मात्र विविधतेवर वरवंटा फिरवायचा असंच आहे. उघड आहे ना, निमूटपणे (इंडियावाले ह्याला पीसफुली असं म्हणतील) इंग्रजीचं राज्य लोकांनी स्वीकारावं असं वाटत असेल तर असले विषप्रयोग लपूनछपूनच करायला हवेत.<br /></span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">त्यामुळे विविधतेची भाषा करणारे इंडियायी लोक मुंबईत आपल्या दुकानांना मराठीतल्या पाटीचा विटाळ होणार नाही ह्याची काळजी घेतात. महानगरपालिकेने तसा कायदा केला असला तरी त्याविरोधात न्याय मागायला न्यायालयात धाव घेतात. त्यांच्या शाळांत त्यांना फक्त इंग्रजीच हवी असते. तिथे मराठी शिकवा म्हटलं की लगेच मुलांवरच्या अभ्यासाच्या ओझ्याची आठवण होते. फक्त उच्च पातळीवर असं ओझं देशातल्या अन्यभाषिक लोकांना इंग्रजीतूनच शिकावं लागतं तेव्हा वाटत असेल का हा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही. तिथे मग शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्न निघतो. आणि देशी भाषा ह्या त्या इंग्रजी नसल्याने तर्कतःच मागासलेल्या आहेत.<br /></span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">तुम्ही उच्च शिक्षणात सर्वत्र मराठी अनिवार्य झाली पाहिजे असं नुसतं बोलून पाहा. लगेच असं बोलणं कसं एकारल्या विचाराचं आहे ह्याचे धडे तुम्हाला मिळतील. शेवटी ज्ञानाला भाषेचं बंधन नसतं. आधुनिक जगात बहुभाषिक असणं अनिवार्य आहे. फक्त कोणत्या भाषा शिकणं अनिवार्य आहे ते आम्ही सांगतो. इंग्रजी येणं अनिवार्य आहे. देशी भाषा वगळा त्या बहुभाषिकतेतून.<br /></span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">जगात इंग्रजीचं स्थान आचंद्रसूर्य आहे तेच राहणार आहे असं इंडियायींना वाटतं. चीनी, अरबी ह्या भाषांना कधीच वर्चस्व लाभणार नाही. त्या इंग्रजी थोड्याच आहेत? चीनी, जपानी लोकही इंग्रजी शिकतात. फक्त ते थोडे मागासलेले असल्याने आपल्या भाषांना धरून राहतात. तिथे विकायच्या उत्पादनांची माहिती त्यांना अजून त्यांच्या भाषांत हवी असते. पण ह्या दृष्टीने इंडिया प्रगत आहे. देशी भाषांचे गळे आवळतोच आहोत आम्ही.<br /></span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">बरं, देशाच्या अखंडत्वाचा प्रश्न आहेच. पण हे अखंडत्व स्वाभाविक आहे की लादलेलं आहे? असा प्रश्न विचाराल तर लक्षात ठेवा. हा देशद्रोह ठरेल. मुंबईत राहणाऱ्या अन्य भाषकांनी मराठी शिकायलाच हवी असं म्हणालात कीत्यांना मराठी लादली जात्येय असं वाटतं. शासनव्यवहारात, शिक्षणव्यवहारात, आर्थिक आणि अन्य सामाजिक व्यवहारांत आपण इथल्या समाजावर स्वातंत्र्यानंतरही इंग्रजी लादत आहोत हे त्यांना आठवत नाही? कसं आठवेल? कारण इंग्रजी हीच जगाची भाषा आहे ना. ती जगाची अगदी स्वाभाविक भाषा आहे. जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल किंवा तुम्ही इंग्रजीला विरोध करत असाल तर तर्कतःच तुम्ही मागासलेले, प्रांतीय, जातीयवादी, संकुचित मनोवृत्तीचे, रूढीवादी, शुद्धिवादी, एकारलेले, न्यूनगंडी, अहंगडी, बदलाला विरोध करणारे इ. ठरता. इंग्रजीच्या बाजूने असाल तर तुम्ही पुढारलेले, राष्ट्रीय, उदार, वैश्विक मनोवृत्तीचे, सुधारक, समावेशक, व्यापक, आत्मविश्वासू, विनयशील, नव्याचं स्वागत करणारे होता.<br /></span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">गौरीला आज हे सारं उमगलं असेल असं नाही. पण तिने तिच्या बुद्धीने तिच्यापुरता जो निर्णय घेतला तसा निर्णय घेण्याचं सामर्थ्य आलं पाहिजे. मुद्दा इंग्रजी ही भाषा शिकण्याचा नाहीए. मुद्दा आहे तो एका झापडबंद समजुतीचा. एका भयाचा. एका ढोंगाला बळी पडण्याचा. माझ्या समाजाची भाषा ही त्याच्या आत्मखुणेचा एक महत्त्वाचा भाग आहे. अगतिक होऊन ती आत्मखूण त्याला सोडावी लागावी हे मला अपमानास्पद वाटतं. इंग्रजीवाचून आपल्याला तरणोपाय नाही, आपण आपली भाषा बोलून ज्ञानव्यवहार करूच शकणार नाही, प्रगती करू शकणार नाही हे सर्व समज नाहीसे झाले पाहिजेत. कधी तरी असं होईल असं मला नक्की वाटतं.</span><br /></div></div>सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-6990088571391311285.post-15662196630238500462009-02-01T07:55:00.000-08:002009-02-04T17:12:10.783-08:00इथेही मराठीच...<div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">ह्या अनुदिनीवर मराठीच्या प्रश्नाव्यतिरिक्त इतर विषयांवर लिहायचं असं ठरवलं. पण अन्य माध्यमाच्या शाळांना मराठी भाषा शिकवण्याचे सक्तीचे आदेश महाराष्ट्र-शासनाने दिल्याची बातमी आत्ताच दूरदर्शनवर ऐकली आणि माझ्या नव्या अनुदिनीच्या पहिल्या लेखाचा विषयही मराठीकडेच वळणार हे निश्चित झालं. माझे मित्र मला म्हणतील इथेही मराठीविषयीच लिहिणार असशील तर आणखी एक अनुदिनी कशाला हवी? पण काय करणार? ज्ञानदेवाने म्हटलंच आहे ना<br /></span></div><div style="text-align: center;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">आवडे ते वृत्ति किरीटी । आधी मनौनि उठी ।</span></div><div style="text-align: center;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">मग काया, वाचा, दिठी ।करांसि ये ।।</span></div><div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">जी गोष्ट रात्रंदिवस आपल्या मनाला वेढून राहिलेली असते ती वोलण्या-लिहिण्यात टळणार कशी? ग़ालिबमियाँनी म्हणून ठेवलंय </span></div><div style="text-align: center;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">दिल ही तो है न संग-ओ-खिश्त दर्द से भर न आए क्यूँ ।</span></div><div style="text-align: center;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">रोएंगे हम हज़ार बार कोई हमें सताए क्यूँ ।।</span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">तात्पर्य काय वाघ्याचा पाग्या झाला तरी येळकोट करायची सवय थोडीच जाणार आहे? मूळ स्वभाव जाईना!!!<br /></span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">महाराष्ट्र हे राज्य १९६०मध्ये अस्तित्वात आलं. असा आदेश काढायला मात्र २००९ हे वर्ष उजाडायला लागलं.आपलं शासन मराठीविषयी किती तत्पर आहे हे ह्यातून दिसून येतं. आणि हा आदेश राबवायला काय करणार आहेत हे लगेच माहितीचा अधिकार वापरून विचारायला हवं.</span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. इतर माध्यमांतून (ही का अस्तित्वात आहेत ह्यावर कधी तरी सविस्तर लिहायचंच आहे) शिकणारे विद्यार्थी महाराष्ट्राच्या राजभाषेपासून वंचित का राहावेत? त्यांना ही भाषा शिकवण्याची व्यवस्था करणं हे शासनाचंच कर्तव्य आहे. जर राज्यात राज्याची राजभाषा न येणारी पिढी वावरत असेल तर ती गोष्ट म्हणजे शासनाच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे.</span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">असो. उशिरा का होईना पण शासनाला जाग आली आणि असा निर्णय घेण्याची बुद्धी झाली हेही नसे थोडके. आपण शासनाचं अभिनंदन करू. आणि मराठीचं भलं करणारे ठाम निर्णय घेण्याची आणि ते यशस्वीपणे राबवण्याची परंपरा ह्यातून निर्माण व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करू.</span></div><div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">इथे मराठीबरोबरच इतर विषयांवर लिहिण्याचा मी प्रयत्न करीन. पण ठेच लागली़ तर तोंडून मराठीची वेदना उमटणारच नाही ह्याची निश्चिती नाही.</span></div><div style="text-align: justify;"><span class="Apple-style-span" style="font-size:medium;">पुन्हा भेटू </span></div></div></div>सुशान्तhttp://www.blogger.com/profile/10376412149833446580noreply@blogger.com0